शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

२५ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: March 2, 2017 00:31 IST

कळवण : माकपा ८, भाजपा ३, शिवसेना ४ तर अपक्ष १०

कळवण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक झाल्याने दुरंगीसह तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, षष्ठरंगी लढती झाल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातून अनेक उमेदवारांनी रणांगणात उडी घेतली. मात्र मैदानात दोन हात करताना ४८ पैकी २५ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. त्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुपुत्र कनाशी गटातील भाजपाचे उमेदवार समीर चव्हाण यांच्यासह जयमाला खांडवी व हिराजी चौधरी या दोघा माजी जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.माकपाच्या ८, भाजपा- ३, शिवसेनेच्या ४ तर १० अपक्षांना अनामत गमवावी लागली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या कॉँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने जि.प. व पं. स.च्या लढविलेल्या सर्व जागा जिंकून कळवण तालुक्यात कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण नगर पंचायतीनंतर जि.प. व पं.स.मध्ये विजयाची परंपरा कायम ठेवून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विजयाचा सिलसिला कायम ठेवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. अनुसूचित जमातीसाठी साडेतीनशे, तर सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम होती. त्यात नरूळ व बापखेडा गणातील चार उमेदवार दोन हजार, अनुसूचित जमाती गणातील १५ उमेदवारांचे ५ हजार २५० रुपये, तर पंचायत समितीच्या १९ उमेदवारांचे ७ हजार २५० रुपये शासनाकडे जमा झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ६ व पंचायत समितीच्या १९ अशा एकूण २५ उमेदवारांचे १० हजार २५० रुपये शासनाच्या तिजोरीत पडून महसुलात वाढ झाली आहे.कळवण पंचायत समितीच्या खर्डेदिगर गणातील सोमनाथ चौरे ( शिवसेना), सुनील पवार (माकपा), रामदास ठाकरे (अपक्ष), मोकभणगी गण- विक्र म पवार (माकपा), अनिल सोनवणे (अपक्ष), निवाणे गण- उज्ज्वला पवार (शिवसेना), अलका वाघ (भाजपा), उषाबाई पवार (अपक्ष), मानूर गण- कासूबाई माळी (माकप), बापखेडा गण- मनोज बोरसे (भाजपा), भरत शिंदे (माकपा), कनाशी गण- पुष्पा चव्हाण (माकपा), इंदिरा पवार (अपक्ष), अनुसया बागुल (अपक्ष), अभोणा गण- विलास गवळी ( माकपा), चंद्रकला बहिरम (अपक्ष), प्रमोद ठाकरे (अपक्ष), नरु ळ गण- प्रीती मेणे (शिवसेना), सुमन पवार (अपक्ष)यांची अनामत जप्त झाली. निवडणुकीत अपेक्षित मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत जप्त करण्यात येऊन त्याला पुढील निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागते. माकपा,भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढावल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)