शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

२५ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: March 2, 2017 00:31 IST

कळवण : माकपा ८, भाजपा ३, शिवसेना ४ तर अपक्ष १०

कळवण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक झाल्याने दुरंगीसह तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, षष्ठरंगी लढती झाल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातून अनेक उमेदवारांनी रणांगणात उडी घेतली. मात्र मैदानात दोन हात करताना ४८ पैकी २५ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. त्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुपुत्र कनाशी गटातील भाजपाचे उमेदवार समीर चव्हाण यांच्यासह जयमाला खांडवी व हिराजी चौधरी या दोघा माजी जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.माकपाच्या ८, भाजपा- ३, शिवसेनेच्या ४ तर १० अपक्षांना अनामत गमवावी लागली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या कॉँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने जि.प. व पं. स.च्या लढविलेल्या सर्व जागा जिंकून कळवण तालुक्यात कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण नगर पंचायतीनंतर जि.प. व पं.स.मध्ये विजयाची परंपरा कायम ठेवून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विजयाचा सिलसिला कायम ठेवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. अनुसूचित जमातीसाठी साडेतीनशे, तर सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम होती. त्यात नरूळ व बापखेडा गणातील चार उमेदवार दोन हजार, अनुसूचित जमाती गणातील १५ उमेदवारांचे ५ हजार २५० रुपये, तर पंचायत समितीच्या १९ उमेदवारांचे ७ हजार २५० रुपये शासनाकडे जमा झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ६ व पंचायत समितीच्या १९ अशा एकूण २५ उमेदवारांचे १० हजार २५० रुपये शासनाच्या तिजोरीत पडून महसुलात वाढ झाली आहे.कळवण पंचायत समितीच्या खर्डेदिगर गणातील सोमनाथ चौरे ( शिवसेना), सुनील पवार (माकपा), रामदास ठाकरे (अपक्ष), मोकभणगी गण- विक्र म पवार (माकपा), अनिल सोनवणे (अपक्ष), निवाणे गण- उज्ज्वला पवार (शिवसेना), अलका वाघ (भाजपा), उषाबाई पवार (अपक्ष), मानूर गण- कासूबाई माळी (माकप), बापखेडा गण- मनोज बोरसे (भाजपा), भरत शिंदे (माकपा), कनाशी गण- पुष्पा चव्हाण (माकपा), इंदिरा पवार (अपक्ष), अनुसया बागुल (अपक्ष), अभोणा गण- विलास गवळी ( माकपा), चंद्रकला बहिरम (अपक्ष), प्रमोद ठाकरे (अपक्ष), नरु ळ गण- प्रीती मेणे (शिवसेना), सुमन पवार (अपक्ष)यांची अनामत जप्त झाली. निवडणुकीत अपेक्षित मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत जप्त करण्यात येऊन त्याला पुढील निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागते. माकपा,भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढावल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)