शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

२५ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: March 2, 2017 00:31 IST

कळवण : माकपा ८, भाजपा ३, शिवसेना ४ तर अपक्ष १०

कळवण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक झाल्याने दुरंगीसह तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, षष्ठरंगी लढती झाल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातून अनेक उमेदवारांनी रणांगणात उडी घेतली. मात्र मैदानात दोन हात करताना ४८ पैकी २५ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. त्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुपुत्र कनाशी गटातील भाजपाचे उमेदवार समीर चव्हाण यांच्यासह जयमाला खांडवी व हिराजी चौधरी या दोघा माजी जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.माकपाच्या ८, भाजपा- ३, शिवसेनेच्या ४ तर १० अपक्षांना अनामत गमवावी लागली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या कॉँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने जि.प. व पं. स.च्या लढविलेल्या सर्व जागा जिंकून कळवण तालुक्यात कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण नगर पंचायतीनंतर जि.प. व पं.स.मध्ये विजयाची परंपरा कायम ठेवून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विजयाचा सिलसिला कायम ठेवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. अनुसूचित जमातीसाठी साडेतीनशे, तर सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम होती. त्यात नरूळ व बापखेडा गणातील चार उमेदवार दोन हजार, अनुसूचित जमाती गणातील १५ उमेदवारांचे ५ हजार २५० रुपये, तर पंचायत समितीच्या १९ उमेदवारांचे ७ हजार २५० रुपये शासनाकडे जमा झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ६ व पंचायत समितीच्या १९ अशा एकूण २५ उमेदवारांचे १० हजार २५० रुपये शासनाच्या तिजोरीत पडून महसुलात वाढ झाली आहे.कळवण पंचायत समितीच्या खर्डेदिगर गणातील सोमनाथ चौरे ( शिवसेना), सुनील पवार (माकपा), रामदास ठाकरे (अपक्ष), मोकभणगी गण- विक्र म पवार (माकपा), अनिल सोनवणे (अपक्ष), निवाणे गण- उज्ज्वला पवार (शिवसेना), अलका वाघ (भाजपा), उषाबाई पवार (अपक्ष), मानूर गण- कासूबाई माळी (माकप), बापखेडा गण- मनोज बोरसे (भाजपा), भरत शिंदे (माकपा), कनाशी गण- पुष्पा चव्हाण (माकपा), इंदिरा पवार (अपक्ष), अनुसया बागुल (अपक्ष), अभोणा गण- विलास गवळी ( माकपा), चंद्रकला बहिरम (अपक्ष), प्रमोद ठाकरे (अपक्ष), नरु ळ गण- प्रीती मेणे (शिवसेना), सुमन पवार (अपक्ष)यांची अनामत जप्त झाली. निवडणुकीत अपेक्षित मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत जप्त करण्यात येऊन त्याला पुढील निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागते. माकपा,भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढावल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)