शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ-बहिणीचे जाणे चटका लावून गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST

नांदगाव : कोरोनाकडे बघण्याचा ग्रामीण दृष्टिकोन अद्यापही बदलण्यास तयार नसल्यामुळे या दृष्टिकोनानेच एका भाऊ-बहिणीचा बळी घेतल्याची घटना नांदगाव तालुक्यात ...

नांदगाव : कोरोनाकडे बघण्याचा ग्रामीण दृष्टिकोन अद्यापही बदलण्यास तयार नसल्यामुळे या दृष्टिकोनानेच एका भाऊ-बहिणीचा बळी घेतल्याची घटना नांदगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वीच घडली आहे. वेळेत उपचार न झाल्याने ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या महिलेच्या परिवाराने तिला माहेरी भावाकडे पाठवून दिले. भावाने तिला डॉक्टरकडे नेऊन उपचार करण्याऐवजी घराशेजारी बांधलेल्या कांद्याच्या चाळीत इतरांच्या नजरेपासून दूर ठेवले. जेवण, चहा, अंथरूण, पांघरूण, कपडे सगळे व्यवस्थित पुरवले. विलगीकरणात ठेवले की कोरोना बरा होईल, या भाबड्या आशेत असलेल्या भावाच्या बहिणीची तब्येत अधिकच बिघडली आणि ती काही दिवसांतच इहलोक सोडून गेली.

बहिणीचा कोरोना इतरांपासून लपवून ठेवत त्याने तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. दरम्यान, कोरोनाने त्यालाही गाठले होते. अंगदुखी, ताप या कारणांमुळे त्याची तब्येत बिघडली. आपल्याला कोरोना होणार नाही. या बेफिकिरीत काही दिवस निघून गेले. अखेर हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत रक्तातली ऑक्सिजन पातळी ७० पेक्षाही खाली गेली होती. उपचारांना त्याने दाद दिली नाही. बहिणीच्या मागे भाऊ अनंताच्या प्रवासाला निघून गेला. उपचारांना उशीर झाल्याने अशाच प्रकारे अनेकांची आयुष्ये संपून गेली. कोरोनावर वेळेत उपचार केले तर तो बरा होतो, ही प्रतिमा समाज मनावर ठसणे गरजेचे झाले आहे. भावा-बहिणीचे जाणे त्या खेड्यातील लोकांना मात्र चटका लावून गेले.

इन्फो

वस्तुस्थिती दडवण्याचा प्रयत्न

कुटुंबातील व्यक्तीला कोरोना झाला आहे असे समजले की, कुटुंबच वाळीत टाकले जाते. कोरोना बरा झाला तरी याच्यापासून ‘धोका’ आहे या नजरेनेच बघितले जाते. त्यामुळे आहे ते लपविण्याची मानसिकता तयार झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने प्रचंड दहशत निर्माण केली होती. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला गावबंदी केली जायची व विलगीकरणास सामोरे जावे लागायचे. दुसऱ्या लाटेत मात्र गावात प्रवेश मिळत असला तरी कोरोनाला चिकटलेली सामाजिक कलंकाची भीती अद्याप गेलेली नाही. यामुळेच कुटुंबातली व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, वस्तुस्थिती समाजापासून दडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.