शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पुरातत्व विभाग : नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरव स्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:16 IST

मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरवस्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

गिरीश जोशी ।मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.महाराष्टÑ अगदी प्राचीन काळापासून वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. राज्यातील गड-किल्ले हे जनतेच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहेत. या किल्ल्यांची देखभाल, जतन व संवर्धन करणे, त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महाराष्टÑ शासनातर्फे १६ सप्टेंबर २०१६ ते १६ आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारकांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे प्राचीन वास्तुशास्त्राचे नमुने, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विभागातील पाच किल्ले व गडांवर स्वच्छतेचा जागर घुमला. पुरातत्व विभाग नाशिक यांच्या अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक असलेल्या मनमाडजवळील अनकाई-टणकाई किल्ला, मालेगाव किल्ला, गाळण (ता. मालेगाव) येथील किल्ला, खर्डा (जि. अहमदनगर) येथील किल्ला, पारोळा (जि. जळगाव) या पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. किल्ला परिसरातील घाण कचरा, प्लॅस्टिक रिकामी पाकिटे, कॅरीबॅग गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, तंत्र सहायक अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनकाई-टणकाई किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेसाठी महाराष्टÑ इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा, अहल्याबाई होळकर विद्यालय, मनमाड महाविद्यालय, मनमाड पालिका, अनकाई ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला होता. उपक्रम यशस्वी करण्याच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या गड संवर्धन सन्मान सोहळ्यात नाशिक विभागातील २१ संस्था व संघटनांचा गौरव करण्यात येणार आहे.

राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या विभागातील पाच गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करणाºया २१ दुर्गप्रेमी व सेवाभावी संस्थांचा मुंबई येथे गड संवर्धन सन्मान सोहळ्यात शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे.- डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग.