शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पुरातत्व विभाग : नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरव स्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:16 IST

मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरवस्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

गिरीश जोशी ।मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.महाराष्टÑ अगदी प्राचीन काळापासून वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. राज्यातील गड-किल्ले हे जनतेच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहेत. या किल्ल्यांची देखभाल, जतन व संवर्धन करणे, त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महाराष्टÑ शासनातर्फे १६ सप्टेंबर २०१६ ते १६ आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारकांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे प्राचीन वास्तुशास्त्राचे नमुने, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विभागातील पाच किल्ले व गडांवर स्वच्छतेचा जागर घुमला. पुरातत्व विभाग नाशिक यांच्या अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक असलेल्या मनमाडजवळील अनकाई-टणकाई किल्ला, मालेगाव किल्ला, गाळण (ता. मालेगाव) येथील किल्ला, खर्डा (जि. अहमदनगर) येथील किल्ला, पारोळा (जि. जळगाव) या पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. किल्ला परिसरातील घाण कचरा, प्लॅस्टिक रिकामी पाकिटे, कॅरीबॅग गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, तंत्र सहायक अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनकाई-टणकाई किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेसाठी महाराष्टÑ इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा, अहल्याबाई होळकर विद्यालय, मनमाड महाविद्यालय, मनमाड पालिका, अनकाई ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला होता. उपक्रम यशस्वी करण्याच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या गड संवर्धन सन्मान सोहळ्यात नाशिक विभागातील २१ संस्था व संघटनांचा गौरव करण्यात येणार आहे.

राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या विभागातील पाच गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करणाºया २१ दुर्गप्रेमी व सेवाभावी संस्थांचा मुंबई येथे गड संवर्धन सन्मान सोहळ्यात शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे.- डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग.