शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शहरात डासांची घनता धोकादायक पातळीवर

By admin | Updated: May 28, 2016 23:02 IST

उपद्रव वाढला : धूर, औषध फवारणीची मागणीं

 नाशिक : वाढत्या उष्णतामानामुळे मध्यंतरी शहरात डासांचे प्रमाण कमी झाले असतानाच बदलत्या वातावरणामुळे पुन्हा एकदा डासांचा उपद्रव वाढला असून, शहरात सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरात डासांची घनता धोकादायक पातळीच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. डासांपासून मुक्तता मिळण्यासाठी धूर, औषध फवारणी वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दोन आठवड्यांपूर्वी शहरात वाढत्या तपमानामुळे डासांची संख्या कमी झाली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा डासांची प्रादुर्भाव वाढला असून, डासांची घनता ४.६५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. डासांची घनता पाचपेक्षा जास्त आढळून आल्यास धोकादायक स्थिती मानली जाते. मात्र दि. २० ते २६ मे या कालावधीत महापालिकेने मोजलेली घनता पाहता सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरात धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, रात्रीची झोप उडाली आहे. प्रामुख्याने, तपोवन, दसक-पंचक परिसर, नांदूर-मानूर परिसर, टाकळीरोड या ठिकाणी गोदापात्रानजीक तसेच नासर्डी व वालदेवी नदी परिसरात डासांची घनता जास्त आढळून आली असून, महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मनपामार्फत डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी नियमित केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी अशी फवारणी होतच नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.