शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पूरग्रस्तांना मदतीस डीसीपीएस कर्मचाºयांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:12 IST

दाभाडी : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे; मात्र राज्यभरातील अंशदायी पेन्शन लागू असणाºया कर्मचाºयांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कापू नये असे लेखी नकारपत्र या कर्मचाºयांनी दिले आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाने कोणतेच पाऊल उचलले नसल्याने कर्मचाºयांनी हा पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देदाभाडी : शासनाने जुनी पेन्शनसाठी कार्यवाही न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

नीलेश नहिरे ।दाभाडी : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे; मात्र राज्यभरातील अंशदायी पेन्शन लागू असणाºया कर्मचाºयांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कापू नये असे लेखी नकारपत्र या कर्मचाºयांनी दिले आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाने कोणतेच पाऊल उचलले नसल्याने कर्मचाºयांनी हा पवित्रा घेतला आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लादण्यात आली आहे. ही योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी आंदोलन व उपोषण करीत आहेत; मात्र शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.डीसीपीएसमुळे कर्मचाºयांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य धोक्यात आले आहे. डीसीपीएस धारकांच्या कुटुंबीयांची काळजी न करणारे महाराष्ट्र शासन आता त्याच कर्मचाºयांंकडून केरळच्या मदतीसाठी पैसे कापण्यासाठी आवाहन करीत आहे. त्यामुळे संघटनेने केरळसाठी वेतन कपातीस लेखी नकारपत्र देण्याचा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील अनेक कर्मचाºयांनी आपल्या विभागप्रमुखांकडे हे नकारपत्र सोपविले आहे. २००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करणाºया जवळपास ३ हजार कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने या कर्मचाºयांच्या कुटुंबीयांपुढे आज जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे राज्य शासन ढुंकूनही पाहायला तयार नाही. त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू न करणाºया शासनाला जागे करण्यासाठी केरळ मदतीस नकार देत असल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी सांगितले.आतापर्यंत कर्मचाºयांनी शेतकरी, भूकंपग्रस्त तसेच अनेक आपत्तीग्रस्तांना स्वत:च्या पगारातील रक्कम देऊन मदत केली आहे; मात्र शासन त्यांची जाण ठेवत नसून डीसीपीएस बांधवांवर अन्याय करीत असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यामुळे आता केरळच्या मदतीसाठी आमच्या वेतनातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे घेतले जाऊ नये, त्याऐवजी आम्ही राज्यस्तरावर रोखीने निधी एकत्र करून थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करू, असे मत डीसीपीएस कर्मचाºयांनी यावेळी व्यक्त केले आहे. शासनाने डीसीपीएस धारकांना जुनी पेन्शनबाबत कोणतीही सकारात्मक पाऊले उचलली नाहीत, अनेक आंदोलने व उपोषण करूनही पुढे कार्यवाही केली नाही, अनेक वेळा आश्वासने दिलीत; मात्र त्यांची पूर्तता करण्यात आली नसल्याने डीसीपीएसधारकांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यास मुख्यमंत्री सहायता निधीत कपात करण्यास नकार दिला असून आम्ही प्रत्यक्ष पैसे गोळा करून केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीत जमा करणार आहोत.- भाऊसाहेब कापडणीस (डीसीपीएसधारक कर्मचारी)