शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

डेंग्यूचा जोर ओसरला

By admin | Updated: November 17, 2016 00:35 IST

थंडीत वाढ : धोकादायक शहरातून नाशिक बाहेर

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने डेंग्यूचाही जोर ओसरत चालला असून शासनाने डेंग्यूबाबत जाहीर केलेल्या धोकादायक शहरांच्या यादीतून नाशिक बाहेर पडले आहे. आता राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांमध्ये डेंग्यूचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे सांगितले जात आहे.गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिककरांना डेंग्यूच्या आजाराने पछाडले आहे. यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रामुख्याने जून ते आॅक्टोबर या कालावधीत रुग्णसंख्या जास्त होती. नाशिकसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातल्याने शासनाच्या आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेत विशेष कृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. डेंग्यूच्या आजारामुळे धोकादायक शहरांच्या यादीत नाशिकचाही समावेश होता. महापालिकेनेही वारंवार मोहिमा राबवून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचे काम केले, परंतु डेंग्यूच्या आजाराची रुग्ण संख्या काही केल्या कमी होत नव्हती. महापालिकेने त्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारालाही जबाबदार ठरवत काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, महापालिकेकडून प्रयत्न सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही घट होताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये यावर्षी १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत २१६४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी ८०९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. या महिन्यात दि. १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत १३४ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ३४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)