शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:14 IST

पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने तातडीने या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  गेल्या दहा दिवसांत वडाळागावात सांधेदुखी व विषाणू तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबविली तसेच डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधली असता ४६ घरांमध्ये एडिस डासाची उत्पत्ती आढळून आली.  त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणी करून डासांची उत्पत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न युद्धपातळी चालविला असतानाच पांडवनगरी परिसरात दोन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे ८० इमारती असून, दोन इमारतींदरम्यान मोठ्या प्रमाणात गाजर गवत व केरकचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी भूमिगत गटारींचे आणि शौचालयाच्या टाकीतील घाण बाहेर डबक्याच्या स्वरूपात साचले असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने आरोग्य विभागाने संबंधित मिळकतधारकांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहेहिरावाडीत नागरिक भयभीतपंचवटी मलेरिया विभागाच्या वतीने संपूर्ण परिसरात नियमितपणे औषध व धूरफवारणी केल्याचा दावा केला जात असताना हिरावाडीतील (भगवतीनगरला) डेंग्यूसदृश आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. डेंग्यूसदृश आजाराचे आढळलेले संशयित रुग्ण हे एकाच घरातील असून, ते कोणा एका अधिकाºयाचे नातेवाईक असल्याने खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने तत्काळ रुग्ण आढळलेल्या संबंधित ठिकाणी जाऊन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. तसेच ज्या घरात रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत पाठविल्याचे समजते. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मनपाच्या संबंधित विभागाकडून केवळ मोजक्याच ठिकाणच्या भागात औषध व धूरफवारणी केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू