शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भटक्या-विमुक्त समाजाची निदर्शने

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

वंचित : जात प्रमाणपत्राच्या अटी शिथिल करा

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६८ वर्षे झाली; मात्र अद्यापही भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील लोक अद्यापही भटकंती करतच उदरनिर्वाह करत आहेत. सरकारकडून या वर्गातील लोकांच्या विकासासाठी व्यापक व प्रभावी प्रयत्न केले जात नसल्यामुळे भटके-विमुक्त लोक विकासापासून कोसो दूर आहे. हिवाळी अधिवेशनात भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मितीचा ठराव मंजूर करावा, या प्रमुख मागणीसाठी भटके-विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. भटक्या-विमुक्त प्रवर्गातील लोकांचा विकास अद्यापही खुंटलेला असून घटनेप्रमाणे आजही मूलभूत हक्कांसाठी या लोकांना संघर्ष करावा लागत आहे. या प्रवर्गातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही जाचक अटी शासनाने टाकल्या आहेत. त्या तातडीने शिथिल कराव्यात, तसेच भटक्या-विमुक्तांना राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात किमान दहा टक्के निधी दिला जावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भटक्या-विमुक्तांना संपूर्ण आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले. भटक्या-विमुक्त समाजातील कलावंतांना मासिक मानधन शासनाने सुरू करावे आदि मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी रतन सांगळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, अशोक जाधव, बाळासाहेब नळवाडे, रामचंद्र कराटे, अण्णा चव्हाण, गिरिजा चौथे, रंजना जाधव, धोंड्याबाई साबळे, सुनीता वाव्हळ आदिंसह भटक्या-विमुक्त समाजातील लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी)