शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

भटक्या-विमुक्त समाजाची निदर्शने

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

वंचित : जात प्रमाणपत्राच्या अटी शिथिल करा

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६८ वर्षे झाली; मात्र अद्यापही भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील लोक अद्यापही भटकंती करतच उदरनिर्वाह करत आहेत. सरकारकडून या वर्गातील लोकांच्या विकासासाठी व्यापक व प्रभावी प्रयत्न केले जात नसल्यामुळे भटके-विमुक्त लोक विकासापासून कोसो दूर आहे. हिवाळी अधिवेशनात भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मितीचा ठराव मंजूर करावा, या प्रमुख मागणीसाठी भटके-विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. भटक्या-विमुक्त प्रवर्गातील लोकांचा विकास अद्यापही खुंटलेला असून घटनेप्रमाणे आजही मूलभूत हक्कांसाठी या लोकांना संघर्ष करावा लागत आहे. या प्रवर्गातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही जाचक अटी शासनाने टाकल्या आहेत. त्या तातडीने शिथिल कराव्यात, तसेच भटक्या-विमुक्तांना राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात किमान दहा टक्के निधी दिला जावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भटक्या-विमुक्तांना संपूर्ण आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले. भटक्या-विमुक्त समाजातील कलावंतांना मासिक मानधन शासनाने सुरू करावे आदि मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी रतन सांगळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, अशोक जाधव, बाळासाहेब नळवाडे, रामचंद्र कराटे, अण्णा चव्हाण, गिरिजा चौथे, रंजना जाधव, धोंड्याबाई साबळे, सुनीता वाव्हळ आदिंसह भटक्या-विमुक्त समाजातील लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी)