शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

व्याज माफ करण्याची मागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST

वाहनचालकांच्या अडवणुकीची तक्रार नाशिक : नाशिक परिवहन कार्यालयात असलेल्या स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण केंद्राकडून वाहनचालकांची अडवणूक केली केली ...

वाहनचालकांच्या अडवणुकीची तक्रार

नाशिक : नाशिक परिवहन कार्यालयात असलेल्या स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण केंद्राकडून वाहनचालकांची अडवणूक केली केली जात असल्याची तक्रार भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. या केंद्राकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोपही परिवहनमंत्री, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी

नाशिक : दिवसागणिक वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी शहरातील भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. पेट्रोल दरवाढीमुळे अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांना व्यवसाय करणे अवघड झाले असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवाढ कमी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पंचवटी वाचनालयात आदरांजली कार्यक्रम

नाशिक : पंचवटी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. ॲड. उत्तमराव ढिकले यांची ८१वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. मुखेडकर होते. नथूजी देवरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.

दिव्यांगांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

नाशिक : महराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने राज्यातील दिव्यांगांना विनामूल्य रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांंग व्यक्तींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. िद. २८ फेब्रुवारीपर्यंत लिंक सुरू राहणार आहे. इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक अमावस्थेला अन्नदान

नाशिक : श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने शिवप्रसाद शास्त्री यांच्या मर्गदर्शनाखाली पंचवटी येथे प्रत्येक अमावस्येला अन्नदान व तर्पण विधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्यातील अनेक भाविक ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी गुरुवर्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ३०० भाविकांना अन्नदान करण्यात आले.

उपनगरला कमी दाबाने पाणी

नाशिक : शहरातील उपनगर परिसरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.