शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी

By admin | Updated: October 21, 2015 22:10 IST

सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी

पंचवटी : सेवाकुंज परिसरात अनेक शाळा असून, वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने सेवाकुंज परिसरात लक्ष वेधून ‘भुयारी मार्ग’ तयार करावा, अशी मागणी नागरिक व विद्यार्थी पालकांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी शहर बसने आजी व दोघा नातवंडांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत अडीच वर्षीय रोनितचा बळी गेला होता, तर त्याची आजी संगीता चौहान ही गंभीर जखमी झाली होती. ही घटना घडल्याने शेकडो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातग्रस्त बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. भुयारीमार्ग, तसेच वाहतूक पोलिसांची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रोनितचा बळी गेल्याची घटना घडल्याचे सांगून नागरिकांनी प्रशासनावर तोफ डागली होती.काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे बसखाली दोघे विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरातील आर. पी. विद्यालय, श्रीराम विद्यालय, पंचवटी एज्युकेशन संस्था तसेच स्थानिक नागरिकांनी वर्षानुवर्षे मनपा व पोलीस प्रशासनाकडे भुयारी मार्ग करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती; परंतु प्रशासनाने त्याची आजपावेतो दखल घेतलेली नाही. सेवाकुंज परिसरातील शाळा व दररोज रस्ता ओलांडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने आता तरी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुयारी मार्ग बनविण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)