शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार घडत ...

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

--

खाद्यतेल महागले, सामान्यांचे बजेट कोलमडले

नाशिक : खाद्यतेलाच्या किमती महागल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. सध्या खाद्यतेल दीडशे ते १९० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने सामान्य कुटुंबांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

--

कोरोना रुग्णावर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार

नाशिक : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक नातेवाईक रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करीत आहेत. परंतु, असे करताना रुग्णांना तपासणीसाठी नेताना आणताना नातेवाईक रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका वाढला आहे.

--

शेतकऱ्यांकडून कांद्याची हातविक्री

नाशिक : कोरोनामुळे कांदा व्यापार थंडावला असून कांद्याचे भावही सातत्याने घसरू लागले आहे. त्यामुळे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील विविध भागांत वाहनांमधून अथवा भाजीबाजारात हातविक्रीने कांद्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असले तरी मोठ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काद्याचे भाव घसरल्याने अडचण झाली आहे.

---

कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी

नाशिक : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी आरोग्यक्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांनी केली आहे. अनेक रुग्णांमध्ये कोरानाची लक्षणे नसल्याने ते खुलेआम फिरत असून कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरत आहेत. अशा नागरिकांच्या चाचण्या करून बाधित रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्याची मागणीही सामाजिक संस्थांकडून होत आहे.

---

शहरातील रस्त्यांवर गर्दी कायम

नाशिक : शहरातील बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. अनेक नागरिक कोरोनाच्या संकटातही घराबाहेर पडत असून काही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.