शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मालेगावी दोन महिने सिग्नल बंद ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST

मालेगावसह परिसरात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवू लागला आहे. लोक उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी सावलीचा आधार शोधत असतात, परंतु ...

मालेगावसह परिसरात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवू लागला आहे. लोक उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी सावलीचा आधार शोधत असतात, परंतु मोसमपूल भागात दुपारी भरउन्हात नागरिकांना सिग्नलवर उन्हाच्या कडाक्यात उभे राहावे लागत आहे. त्यात अनेक वृद्धांना उन्हाची झळ बसत आहे. कारण सिग्नल पडल्यानंतर नागरिकांना दीड ते दोन मिनिटे सिग्नलवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. उन्हाच्या झळांमुळे चक्कर येऊन पडण्याचे प्रमाणही वाढत आहे.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मनपा प्रशासनातर्फे गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. मंगल कार्यालये आणि बाजारपेठांमध्येही नागरिकांना गर्दी होऊ नये, म्हणून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, मोसमपूल भागात सिग्नल पडल्यानंतर वाहनांची मोठी रांग लागते. त्यामुळे या भागात प्रचंड गर्दी होते. यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. परिणामी, नागरिकांना शिस्त लावतानाच काेरोनाचा प्रसार तर होत नाही ना, याचाही विचार करण्याची गरज आहे. उन्हाची वाढती तीव्रता आणि काेरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, किमान जूनपर्यंत मोसमपूल भागातील सिग्नल बंद ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

ऊन वाढत असल्याने सिग्नल जवळ वाहतूक पोलीस इतका वेळ उभा राहणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलीस नसल्याची संधी साधून नागरिक आणखी गर्दी करीत आहेत. याचाच परिणाम म्हणून काही वेळा रिक्षा चालकांतही वाद होऊन हाणामारीचे प्रकार घडले आहेत. मोसम पुलावर दोन्ही बाजूस एकतर रिक्षा उभ्या असतात. त्यात सिग्नल बंद असल्याने, उन्हात शेजारी वाहन चालकांना उभे राहावे लागत असल्याने, फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.