शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

आडत, तोलाई बंद करण्याची मागणी

By admin | Updated: December 23, 2014 00:16 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावालाच

चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक कधी थांबणार, असा संतप्त सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व भाजपाचे नेते विलासराव ढोमसे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावाला असतात. आजपर्यत प्रत्येक बाजार समिती ही व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावरच चालत आहे. सर्वच निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचे घेतले जातात. म्हणूनच आडत पद्धती बंद करुन घेईल त्याचीच आडत केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. घेईल त्याची आड पद्धतीमुळे शेतकरी व आडतदार यांचा संबंध संपुष्टात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची थट्टाच केली जाते. शेतकरी अडाणी आहे, शेतकऱ्यांला काही समजत नाही असा व्यापाऱ्यांचा समज आहे; परंतु आता शेतकऱ्यांनाही कायद्याचे ज्ञान झाले आहे. म्हणूनच राजरोसपणे चाललेली लूट, मग ती तोलाई हमालीची असो की आडतीची असो, हे शेतकऱ्यांना समजायला लागले आहे. परंतु शेतकरी असंघटित असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. शासनाने व विशेषत: पणन संचालक डॉ. सुभाष माने यांना शासनाने मुदतवाढ देऊन या संपूर्ण यंत्रणेवर आळा बसविण्यासाठी निर्णय घ्यावा. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी शासनाच्या पाठीमागे उभे राहतील. बाजार समितीच्या संचालक मंडळाने खरेदी-विक्रीमधून लाखोची माया जमा केली आहे, त्याचीही चौकशी पणनमंत्र्यांनी करावी. जशी गुजरातमध्ये कोणतीही कपात होत नाही त्याप्रमाणे निर्णय करावा, अशी मागणी ढोमसे यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)