येवला : मतदारायादीत नावे नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले, विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने मतदारयाद्यांचा पुनसर्वेक्षण करावा, अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी यांच्यासह पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या असलेले निवेदन येवला तहसीलदार यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यात अनेकांची नावे न आल्याने मतदानापासून वंचित राहिले आहेत. पुरुष व महिलांच्या नावांची व छायाचित्राच्या जागांची अदलाबदल होणे, मतदारयादीत नाव न सापडले. एका भागात रहिवास, तर दुसर्याच यादीतील भागात मतदारांचे नाव अशा अनेक त्रुटी मतदारयाद्यात राहिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवूनये यासाठी पुन्हा एकदा मतदार याद्यांचे सर्वेक्षण करावे व नावे समाविष्ट करावी. यादीतील चुका दूर कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)
मतदार याद्याचे पुनसर्वेक्षण करण्याची मागणी
By admin | Updated: June 1, 2014 01:10 IST