शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नांदगाव : तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गळती होऊन ...

नांदगाव : तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर दुरुस्तीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

सन १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. या पायाभरणी समारंभाला पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हजेरी लावली होती. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. गिरणा प्रकल्प नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. त्याचा बांधकाम खर्च १३ कोटी रुपये झाला होता. गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४० कि.मी. तर चातर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोऱ्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचा‍ऱ्यांच्या दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे बनले आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याकडे गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत असते. गिरणा धरणातून मालेगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजना आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सुमारे ७५ टक्के लोकसंख्येची यावर तहान भागते. सदर धरणाच्या कालव्यासह पाटचाऱ्यांची तातडीने दुरूस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

फोटो- २८ गिरणा डॅम

सन १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. (संग्रहित छायाचित्र माजी आमदार अनिल अहेर यांच्या सौजन्याने)

===Photopath===

280521\28nsk_37_28052021_13.jpg

===Caption===

फोटो- २८ गिरणा डॅमसन १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या पाया भरणी समारंभप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. (संग्रहित छायाचित्र माजी आमदार अनिल अहेर यांच्या सौजन्याने)