शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:18 IST

तीन आठवड्यांपूर्वी चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते; परंतु कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी व पाणी गळतीमुळे ...

तीन आठवड्यांपूर्वी चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते; परंतु कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी व पाणी गळतीमुळे कालव्याचे पाणी किशोर सागर धरणापर्यंत पोहोचलेच नाही. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला होता.

देवळा तालुक्यात चणकापूर उजव्या कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे आगामी काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.

चणकापूर धरण क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जनतेच्या आशा पालवल्या असून कालव्याला पूर पाणी सोडण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते, पिकांचे नियोजन करता येत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

देवळा तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे या भागातील पाझर तलाव, धरणे, साठवण बंधारे, कोरडेच आहेत. पूर्व भागात आताच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, वाखारी, दहिवड, मेशी, सुभाषनगर, वाखारवाडी, खुंटेवाडी, उमराणा आदी वाढीव कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता किशोर सागर धरणातून वाढीव कालव्याला पाणी सोडण्याकडे नजर लावून बसली आहे.परंतु किशोर सागर धरणातच अत्यल्प साठा शिल्लक असल्यामुळे पूर्व भागातील जनता वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

उजव्या कालव्याची कमी वहन क्षमता पाहता रामेश्वर येथील किशोर सागर धरण भरण्यास मोठा कालावधी लागतो. यामुळे किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यास उशीर होतो. त्याचा फटका दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागाला बसतो. कारण पूर्व भागातील कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांची तहान भागेपर्यंत पावसाळा संपून जातो व कालव्याचे पाणी बंद होते. असा दर वर्षाचा अनुभव आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चणकापूर येथे म्हशाड नाल्याचे पाणी कालव्यात वळविण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करावे. तसेच चणकापूर ते रामेश्वरपर्यंत उजव्या कालव्याचे विस्तारीकरण लवकर करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.

(२३ देवळा वॉटर)

देवळा तालुक्यासाठी वरदान असलेले किशोर सागर धरण.

230821\23nsk_17_23082021_13.jpg

देवळा तालुक्यासाठी वरदान असलेले किशोर सागर धरण.