शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:18 IST

तीन आठवड्यांपूर्वी चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते; परंतु कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी व पाणी गळतीमुळे ...

तीन आठवड्यांपूर्वी चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते; परंतु कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी व पाणी गळतीमुळे कालव्याचे पाणी किशोर सागर धरणापर्यंत पोहोचलेच नाही. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला होता.

देवळा तालुक्यात चणकापूर उजव्या कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे आगामी काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.

चणकापूर धरण क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जनतेच्या आशा पालवल्या असून कालव्याला पूर पाणी सोडण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते, पिकांचे नियोजन करता येत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

देवळा तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे या भागातील पाझर तलाव, धरणे, साठवण बंधारे, कोरडेच आहेत. पूर्व भागात आताच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, वाखारी, दहिवड, मेशी, सुभाषनगर, वाखारवाडी, खुंटेवाडी, उमराणा आदी वाढीव कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता किशोर सागर धरणातून वाढीव कालव्याला पाणी सोडण्याकडे नजर लावून बसली आहे.परंतु किशोर सागर धरणातच अत्यल्प साठा शिल्लक असल्यामुळे पूर्व भागातील जनता वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

उजव्या कालव्याची कमी वहन क्षमता पाहता रामेश्वर येथील किशोर सागर धरण भरण्यास मोठा कालावधी लागतो. यामुळे किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यास उशीर होतो. त्याचा फटका दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागाला बसतो. कारण पूर्व भागातील कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांची तहान भागेपर्यंत पावसाळा संपून जातो व कालव्याचे पाणी बंद होते. असा दर वर्षाचा अनुभव आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चणकापूर येथे म्हशाड नाल्याचे पाणी कालव्यात वळविण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करावे. तसेच चणकापूर ते रामेश्वरपर्यंत उजव्या कालव्याचे विस्तारीकरण लवकर करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.

(२३ देवळा वॉटर)

देवळा तालुक्यासाठी वरदान असलेले किशोर सागर धरण.

230821\23nsk_17_23082021_13.jpg

देवळा तालुक्यासाठी वरदान असलेले किशोर सागर धरण.