शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

येवला येथे घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी धरणे

By admin | Updated: February 6, 2016 22:23 IST

येवला येथे घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी धरणे

 येवला : नगर परिषदेने अवास्तव व अन्यायकारक पद्धतीने आकारण्यात आलेली चतुर्थ वार्षिक एकत्रित कर घरपट्टीवाढ कमी करावी या मागणीसाठी येवला शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर दोन तास धरणे धरले, घरपट्टी रद्द झालीच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा दिल्या.गावठाण बाहेरील मिळकतीसाठी भाडे अंदाजावर २५ टक्के वाढ करून गावठाणातील मिळकतीवर घरगुती वापरासाठी ४० टक्के वाढ व वाणिज्य वापरासाठी ६० टक्के वाढ केलेली आहे. मनमाड नगर परिषदेची अंतिम चतुर्थ वार्षिक कर आकारणी नुकतीच झालेली असून, त्यांनी फक्त भाडे अंदाजावर आठ टक्के वाढ केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे येवले नगर परिषदेने केलेली घरपट्टीवाढ ही अवास्तव, अवाजवी व येवलेकर जनतेवर अन्याय करणारी आहे. यानंतर शहरवासीयांना पालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या ३० टक्के रक्कम भरून अपिलीय समितीपुढे अपील दाखल करता येणार आहे. अपिलीय पाच सदस्यीय समितीत जिल्हाधिकारी प्रतिनिधी अर्थात प्रांताधिकारी, नगररचना विभागाचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष, महिला बालकल्याण समिती सभापती व विरोधी पक्षनेता यांचा समावेश असणार आहे. त्यावेळी नगराध्यक्ष व समितीतील नगरपालिका सदस्य यांनी जनतेची बाजू घेऊन दुष्काळाचा विचार करता अवास्तव केलेली वाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा. तसेच कामकाजाच्या दृष्टिकोनातून मार्चपर्यंत वसुली करणे अनुदानाच्या दृष्टीने गरजेचे असल्याने सध्याची आकारणी करून तसेच मागील वर्षाचा फरक वसूल करण्यास येवलेकर मदतच करतील, फक्त कमी होणारी रक्कम ही पुढील वर्षासाठी आगाऊ जमा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.येवला पालिकेने गेल्या दोन वर्षात सहा महिन्यांच्या अंतराने घरपट्टीवाढ कर आकारणी संबंधात तीन ठराव केले आहेत. या ठरावात घरपट्टी कर आकारणीसंदर्भात संभ्रम निर्माण करणारा असल्याने सदर घरपट्टी कमी करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदर भरमसाठ अन्यायकारक घरपट्टीवाढीबाबत जनतेत पालिकेच्या विरोधात असंतोष पसरला आहे. यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवक, विरोधीपक्ष नेते यांनी अपिलीय समितीसमोर जनतेची बाजू मांडावी व घरपट्टी कमी करून दिलासा द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरोधात मोठे व उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करून होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा उभा करेल, असा इशारा दिला आहे. या आंदोलनात भाजपा नेते श्रीकांत गायकवाड, प्रमोद सस्कर, मीननाथ पवार, गीताराम दारूणकर, राधेश्याम परदेशी, राजेंद्र काबरा, गणेश खाळेकर, संजय करंजकर, दुर्गा भांडगे, लीलाबाई पेटकर, रत्ना गवळी, युवराज पाटोळे, तरंग गुजराथी, संकेत वाडेकर, सुमित खानापुरे, देवेंद्र मोहरे, राजेश सोनवणे, अरुण काथवटे, संजय खानापुरे, सुनील काटके यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)