शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

आंदोलनकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:24 IST

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

ठळक मुद्देपुनंद प्रकल्प : सहायक जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांचे निवेदन

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.दरम्यान कळवण तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन व मागणीसंदर्भात विचार करून शासनस्तरावरु न ११ मार्चपर्यंत सटाणा नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना रद्द करावी अन्यथा ११ मार्चपासून कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी , शेतकरी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, रामदास देवरे, किसान सभेचे तालुका सरचिटणीस मोहन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामा पाटील यांच्या शिष्टमंडळाने सहायक जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांची भेट घेऊन निवदेन देऊन चर्चा केली. राज्य सरकारने आम्हाला आंदोलन करण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.आजपासून काम सुरू होण्याची शक्यता सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला विरोध केला तर तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करू, शेतात असलेली पिके तत्काळ काढा नाहीतर नासधूस करू, असा सज्जड दम पोलीस यंत्रणेने पुनंद प्रकल्प परिसरातील सुपले दिगर भागातील आदिवासी बांधवांना दिल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहे. पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी संदर्भात पोलीस यंत्रणा, पाणीपुरवठा योजना विभाग यंत्रणेने बुधवारी पाहणी करून सुपले दिगर परिसरात शेतकरी बांधवांना सूचना केल्या. गुरुवार (दि.७) सकाळपासून जलवाहिनी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी बांधवांचा असलेला विरोध पत्करून राज्य सरकार, पोलीस यंत्रणा धाकदडपशाही करून पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार असेल तर ते स्वप्न धुळीस मिळवू व आदिवासी जनतेला बरोबर घेऊन जनआंदोलन हाती घेऊ, असा इशारा देण्यात आला आहे.