शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:24 IST

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

ठळक मुद्देपुनंद प्रकल्प : सहायक जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांचे निवेदन

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.दरम्यान कळवण तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन व मागणीसंदर्भात विचार करून शासनस्तरावरु न ११ मार्चपर्यंत सटाणा नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना रद्द करावी अन्यथा ११ मार्चपासून कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी , शेतकरी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, रामदास देवरे, किसान सभेचे तालुका सरचिटणीस मोहन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामा पाटील यांच्या शिष्टमंडळाने सहायक जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांची भेट घेऊन निवदेन देऊन चर्चा केली. राज्य सरकारने आम्हाला आंदोलन करण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.आजपासून काम सुरू होण्याची शक्यता सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला विरोध केला तर तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करू, शेतात असलेली पिके तत्काळ काढा नाहीतर नासधूस करू, असा सज्जड दम पोलीस यंत्रणेने पुनंद प्रकल्प परिसरातील सुपले दिगर भागातील आदिवासी बांधवांना दिल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहे. पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी संदर्भात पोलीस यंत्रणा, पाणीपुरवठा योजना विभाग यंत्रणेने बुधवारी पाहणी करून सुपले दिगर परिसरात शेतकरी बांधवांना सूचना केल्या. गुरुवार (दि.७) सकाळपासून जलवाहिनी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी बांधवांचा असलेला विरोध पत्करून राज्य सरकार, पोलीस यंत्रणा धाकदडपशाही करून पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार असेल तर ते स्वप्न धुळीस मिळवू व आदिवासी जनतेला बरोबर घेऊन जनआंदोलन हाती घेऊ, असा इशारा देण्यात आला आहे.