शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बॅँकेची शाखा सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: December 11, 2015 23:51 IST

जयदर : खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना ग्रामस्थांचे निवेदन

नाशिक : कळवण तालुक्यातील जयदर परिसरातील सत्तर खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी बॅँक आॅफ महाराष्ट्रची शाखा सुरू करावी. ही शाखा सुरू झाल्यास परिसरातील हजारो आदिवासी बांधवांची सोय होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ही शाखा त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन जयदर परिसरातील ग्रामस्थांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना दिले.या निवेदनात म्हटले आहे की, जयदर व पुनद खोऱ्यातील ७० गावे -खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील लोकांना गुरुवारी बाजारासाठी जयदरला यावे लागते. या ठिकाणी मोठी आर्थिक देवाण-घेवाणही होते; मात्र हा व्यवहार करण्यासाठी कनाशी येथे जावे लागते. कनाशी येथे बॅँकेत व्यवहारासाठी गर्दी होते. परिणामी लोकांचा वेळ वाया जातो. ग्रामस्थांना कनाशी लांब पडत असल्याने आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. कनाशी ते जांधाळे हे अंतर ६० किलोमीटर असून, जयदर ते जांधाळ ४० किलोमीटर अंतर आहे. हे अंतर आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जयदर येथे महाराष्ट्र बॅँकेची शाखा स्थापन केल्यास गरीब आदिवासी जनतेचा पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या परिसरातील ७० खेड्यांचा भाग असलेल्या व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयदर येथे बॅँक आॅफ महाराष्ट्रची शाखा सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून लवकरात लवकर प्रयत्न करावे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी सरपंच पोपट जगताप, सरपंच सोमनाथ चौरे, शिवराम खांडवी, रघुनाथ महाजन, विश्वास ठाकरे, उत्तम भोये, गोविंद बागुल, रमेश पवार, शिवराम पवार, शिवराम ठाकरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)