शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:44 IST

ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकार कारवाई करत नसल्याने या गोष्टीचा शेतकºयांना त्यांच्या पिकाला मोठा फटका

ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.ममदापूर येथे १५ ते १६ मोकाट गाई आणि वासरे असून दरवर्षीच पिकांची मोठ्या प्रमाणात या जनावरांकडून नासाडी होत आहे. आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करून देखील याप्रकरणी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकार कारवाई करत नसल्याने या गोष्टीचा शेतकºयांना त्यांच्या पिकाला मोठा फटका बसत आहे.ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला सह्या घेऊन तक्र ार अर्ज दिले आहेत. परंतु ग्रामपंचायतने अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई यासंदर्भात केलेली नाही. त्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यात मोकाट जनावरे शेतकºयांच्या पिकांची नासाडी करतात. पंधरा ते सतरा जनावरे शेतातून गेली तरी काही खाऊन तर काही पिक तुडवून शेतकºयाचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने यावर्षी परिसरातील सर्वच पाणी साठे, बंधारे रिकामे आहे त्यामुळे या मोकाट जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. चाºयासाठी सध्या हे मोकाट जनावरे शेतकºयाने आणलेल्या चाºयावर ताव मारतात. त्यामुळे जनावरांचा २६ जानेवारी पर्यंत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. परिसरात कुठेही पाणी शिल्लक नसल्याने सदर मोकाट जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे सदर मोकाट जनावरे पालन करणाºया शेतकºयांना देण्यात यावे किंवा रीतसर लिलाव करावा अशी मागणी होत आहेत.सध्या काही शेतकºयांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी कांद्याच्या डोंगळ्याची लागवड केली असून दुष्काळामुळे पुढील वर्षी बियाणे मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन बियाणे तयार करण्यासाठी पाच ते दहा वाफे डोंगळ्याची लागवड केली आहे. परंतु परिसरात मोकाट जनावरांना गवत नसल्याने या पिकांची नासाडी होऊ शकते. त्यामुळे या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा.विजय गुडघे,शेतकरी, ममदापुर.