शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By admin | Updated: November 25, 2015 23:57 IST

इगतपुरी : भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

इगतपुरी : तालुक्यात गेल्या काही दिवसात सर्वात जास्त बेमोसमी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे.बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. तालुक्यातील सांजेगाव, गोंदे दुमाला, मुरंबी, बेलगाव, कुऱ्हेगाव, नांदगाव, जाणोरी, साकूर, शेणित, घोटी खुर्द, धामणगाव परिसरात भाताच्या सोंगण्या जोरात सुरू असून, अजूनही भात शेतात कापणी करून पडलेले आहे. तर अनेक शेतकऱ्यांचे भात झोडून खळ्यावर पसरलेला आहे. अशा वेळी अचानक झालेल्या पावसाने भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. आधीच भाताचे बाजारमूल्य घसरलेले असताना ओल्या झालेल्या भाताचे आयतेच निमित्त घोटीच्या व्यापाऱ्यांना मिळाले आहे.झालेल्या पावसामुळे चाराही खराब झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे बियाणे टाकले होते. त्यात टमाटे, फ्लावर, काकडी या पिकांचेही नुकसान झाले आहे. भात उत्पादक शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले. शेतकरी ज्या पिकाच्या भरवशावर संपूर्ण वर्षाचे नियोजित जीवन जगायचे तेच मुख्य पीक वाया गेले आहे. ज्या काही ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनी भात सोंगला त्याला ही योग्य भाव मिळत नाही.तहसीलदारांनी सर्व तलाठींना व कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भाताचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे. (वार्ताहर)