शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By admin | Updated: November 25, 2015 23:57 IST

इगतपुरी : भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

इगतपुरी : तालुक्यात गेल्या काही दिवसात सर्वात जास्त बेमोसमी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे.बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. तालुक्यातील सांजेगाव, गोंदे दुमाला, मुरंबी, बेलगाव, कुऱ्हेगाव, नांदगाव, जाणोरी, साकूर, शेणित, घोटी खुर्द, धामणगाव परिसरात भाताच्या सोंगण्या जोरात सुरू असून, अजूनही भात शेतात कापणी करून पडलेले आहे. तर अनेक शेतकऱ्यांचे भात झोडून खळ्यावर पसरलेला आहे. अशा वेळी अचानक झालेल्या पावसाने भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. आधीच भाताचे बाजारमूल्य घसरलेले असताना ओल्या झालेल्या भाताचे आयतेच निमित्त घोटीच्या व्यापाऱ्यांना मिळाले आहे.झालेल्या पावसामुळे चाराही खराब झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे बियाणे टाकले होते. त्यात टमाटे, फ्लावर, काकडी या पिकांचेही नुकसान झाले आहे. भात उत्पादक शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले. शेतकरी ज्या पिकाच्या भरवशावर संपूर्ण वर्षाचे नियोजित जीवन जगायचे तेच मुख्य पीक वाया गेले आहे. ज्या काही ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनी भात सोंगला त्याला ही योग्य भाव मिळत नाही.तहसीलदारांनी सर्व तलाठींना व कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भाताचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे. (वार्ताहर)