शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By admin | Updated: November 26, 2015 21:44 IST

तहसीलदारांना निवेदन : बेमोसमी पावसाचा दापूरकरांना फटका

 सिन्नर : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे दापूर भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करण्याची मागणी दापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी तालुक्यात बेमोसमी पाऊस झाला. या पावसाने दापूर भागातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे पडून द्राक्षे फुटली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठी धडपड करून द्राक्षबागा वाचविल्या होत्या. या अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दापूर येथे ग्रामसभा पार पडली. त्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे व्हावे, अशा मागणीचा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला. या ठरावाची प्रत व मागणीचे निवेदन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले. यावेळी दापूरचे माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, तुकाराम आव्हाड, बाळासाहेब गामणे, भीमाजी आव्हाड, संभाजी आव्हाड, विष्णू आव्हाड, खंडेराव आव्हाड, संतोष आव्हाड, सरला आव्हाड, योगेश आव्हाड, संजय आव्हाड, रामदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)वडनेर परिसरात नुकसानमालेगाव तालुक्यातील वडनेर, सातमाने परिसरात बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करूंन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे बंडूकाका बच्छाव यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, वडनेर व सातमाने शिवारात बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावूननेला. यात प्रामुख्याने बंडूकाका बच्छाव, विनोद जाधव, लखन शिंदे, तर येसगाव येथील तात्या ठाकरे, समाधान अहिरे, गोरख शेलार या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)