शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By admin | Updated: November 26, 2015 21:44 IST

तहसीलदारांना निवेदन : बेमोसमी पावसाचा दापूरकरांना फटका

 सिन्नर : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे दापूर भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करण्याची मागणी दापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी तालुक्यात बेमोसमी पाऊस झाला. या पावसाने दापूर भागातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे पडून द्राक्षे फुटली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठी धडपड करून द्राक्षबागा वाचविल्या होत्या. या अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दापूर येथे ग्रामसभा पार पडली. त्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे व्हावे, अशा मागणीचा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला. या ठरावाची प्रत व मागणीचे निवेदन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले. यावेळी दापूरचे माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, तुकाराम आव्हाड, बाळासाहेब गामणे, भीमाजी आव्हाड, संभाजी आव्हाड, विष्णू आव्हाड, खंडेराव आव्हाड, संतोष आव्हाड, सरला आव्हाड, योगेश आव्हाड, संजय आव्हाड, रामदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)वडनेर परिसरात नुकसानमालेगाव तालुक्यातील वडनेर, सातमाने परिसरात बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करूंन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे बंडूकाका बच्छाव यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, वडनेर व सातमाने शिवारात बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावूननेला. यात प्रामुख्याने बंडूकाका बच्छाव, विनोद जाधव, लखन शिंदे, तर येसगाव येथील तात्या ठाकरे, समाधान अहिरे, गोरख शेलार या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)