शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नाशिक साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: September 12, 2016 01:13 IST

थकहमी स्वीकारावी : शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिकरोड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने थकहमी स्विकारावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.नाशिकच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नासाका कामगार युनियनचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, कार्याध्यक्ष शिवराम गायधनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. गेल्या तीन वर्षापासून नासाका बंद पडल्याने सभासद, उस उत्पादक, कामगार, ट्रक मालक, चालक व इतर सह व्यवसायिक यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज थकल्याने नवीन कर्ज पुरवठा होऊ शकत नाही यामुळे कारखाना सुरु होण्यास अडचण निर्माण झाली आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यातील २१७ गावांचे आहे. कार्यक्षेत्रात मुबलक उस उपलब्ध असून कामगारांची संख्या देखील कमी आहे. या सर्व बाबी कारखान्याच्या जमेच्या बाजू असून शासनाने कारखाना सुरु करण्यासाठी थकहमी स्विकारावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच लक्ष घालू असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सिमा हिरे, देवयाणी फरांदे, बाजीराव भागवत, प्रकाश घुगे, शिवराम गायधनी, सुनिल आडके, निलेश दिंडे, दिलीप गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)