शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राजापूर येथे तीव्र पाणी टंचाई टॅँकर वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:07 IST

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.

ठळक मुद्दे पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी वरून राजाचे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या,वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.तहान भागविण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी राजापूर व पूर्वेकडील भागात पाणी टंचाई असल्याने टॅँकर दोन दिवसापासून आलेले नाहीत, त्यामुळे राजापूर व सोमठाणजोश या दोन गावे व वाड्या, वस्त्यावर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ही पाणी टंचाई दूरकरण्यासाठी टॅँकरमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजापूर येथील वाड्या,वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असून येथे दोन टॅँकरने पाणी पूरवठा सुरू आहे. त्यामध्ये गावासाठी दोन तर वाड्या,वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहेत. परंतू दोन दिवसापासून टॅँकरच आले नसल्याने राजापूर येथे पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती झाली आहे. शिवाय पाऊसच नसल्याने परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.अलगट वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहे. तर काही वस्त्या, वाड्या लहान आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे. जेवढे गाव आहे, त्यापेक्षा जास्त लोक वाड्या,वस्तीवर राहत असल्याने पाणी टंचाई या समस्येने जनता हैराण झाली आहे.गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व अजून राजापूर येथे मोठा पाऊस झाला नसल्याने कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅँकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅँकर गेला कि दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते. त्यामुळे लवकरच आणखी टॅँकर सुरू करण्यात यावे किंवा गावासाठी व वाड्या वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुनिता माळी, उपसंरपच शरद वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडखे, पोपट आव्हाड, बबन अलगट, भारत वाघ, देविदास जाधव, काशिनाथ चव्हाण, सोपान आव्हाड, माधव आगवण आदी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या येवला तालूक्यात चांगला पावसाची नोंद झाली असे हे शासनाला खरे वाटते पण राजापूर येथे विहिरी बंधारे कोरडे ठाक आहेत. टॅकरच्या पाण्यावर येथील जनतेची तहान भागवावी लागत आहे.- शरद वाघ, उपसंरपच, राजापूर.