शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजापूर येथे तीव्र पाणी टंचाई टॅँकर वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:07 IST

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.

ठळक मुद्दे पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी वरून राजाचे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या,वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.तहान भागविण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी राजापूर व पूर्वेकडील भागात पाणी टंचाई असल्याने टॅँकर दोन दिवसापासून आलेले नाहीत, त्यामुळे राजापूर व सोमठाणजोश या दोन गावे व वाड्या, वस्त्यावर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ही पाणी टंचाई दूरकरण्यासाठी टॅँकरमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजापूर येथील वाड्या,वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असून येथे दोन टॅँकरने पाणी पूरवठा सुरू आहे. त्यामध्ये गावासाठी दोन तर वाड्या,वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहेत. परंतू दोन दिवसापासून टॅँकरच आले नसल्याने राजापूर येथे पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती झाली आहे. शिवाय पाऊसच नसल्याने परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.अलगट वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहे. तर काही वस्त्या, वाड्या लहान आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे. जेवढे गाव आहे, त्यापेक्षा जास्त लोक वाड्या,वस्तीवर राहत असल्याने पाणी टंचाई या समस्येने जनता हैराण झाली आहे.गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व अजून राजापूर येथे मोठा पाऊस झाला नसल्याने कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅँकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅँकर गेला कि दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते. त्यामुळे लवकरच आणखी टॅँकर सुरू करण्यात यावे किंवा गावासाठी व वाड्या वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुनिता माळी, उपसंरपच शरद वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडखे, पोपट आव्हाड, बबन अलगट, भारत वाघ, देविदास जाधव, काशिनाथ चव्हाण, सोपान आव्हाड, माधव आगवण आदी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या येवला तालूक्यात चांगला पावसाची नोंद झाली असे हे शासनाला खरे वाटते पण राजापूर येथे विहिरी बंधारे कोरडे ठाक आहेत. टॅकरच्या पाण्यावर येथील जनतेची तहान भागवावी लागत आहे.- शरद वाघ, उपसंरपच, राजापूर.