शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

राजापूर येथे तीव्र पाणी टंचाई टॅँकर वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:07 IST

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.

ठळक मुद्दे पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी वरून राजाचे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या,वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.तहान भागविण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी राजापूर व पूर्वेकडील भागात पाणी टंचाई असल्याने टॅँकर दोन दिवसापासून आलेले नाहीत, त्यामुळे राजापूर व सोमठाणजोश या दोन गावे व वाड्या, वस्त्यावर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ही पाणी टंचाई दूरकरण्यासाठी टॅँकरमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजापूर येथील वाड्या,वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असून येथे दोन टॅँकरने पाणी पूरवठा सुरू आहे. त्यामध्ये गावासाठी दोन तर वाड्या,वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहेत. परंतू दोन दिवसापासून टॅँकरच आले नसल्याने राजापूर येथे पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती झाली आहे. शिवाय पाऊसच नसल्याने परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.अलगट वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहे. तर काही वस्त्या, वाड्या लहान आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे. जेवढे गाव आहे, त्यापेक्षा जास्त लोक वाड्या,वस्तीवर राहत असल्याने पाणी टंचाई या समस्येने जनता हैराण झाली आहे.गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व अजून राजापूर येथे मोठा पाऊस झाला नसल्याने कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅँकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅँकर गेला कि दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते. त्यामुळे लवकरच आणखी टॅँकर सुरू करण्यात यावे किंवा गावासाठी व वाड्या वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुनिता माळी, उपसंरपच शरद वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडखे, पोपट आव्हाड, बबन अलगट, भारत वाघ, देविदास जाधव, काशिनाथ चव्हाण, सोपान आव्हाड, माधव आगवण आदी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या येवला तालूक्यात चांगला पावसाची नोंद झाली असे हे शासनाला खरे वाटते पण राजापूर येथे विहिरी बंधारे कोरडे ठाक आहेत. टॅकरच्या पाण्यावर येथील जनतेची तहान भागवावी लागत आहे.- शरद वाघ, उपसंरपच, राजापूर.