शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:46 IST

निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांसह पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची अडचण

निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांसह पालकांनी केली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या पध्दतीने शिक्षण घेण्यात अडचणीला सामोरे जावे लागले.

ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची अडचण, त्यातच आधी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाकडे ॲण्ड्रॉईड मोबाइलचा अभाव आणि नियमित शेतीकामे यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमध्ये जॉईन होणे अवघड होत होते. निऱ्हाळे -सिन्नर या मार्गावर सध्या दोन बसफेऱ्या सुरू आहेत. त्यात मुख्य निऱ्हाळे मुक्कामाची व सकाळी आठ, १२,२,४ अशा पूर्वीप्रमाणे बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातील प्रवाशी वर्गाने केली आहे.

सकाळी ६ :४५ च्या बसने निऱ्हाळे, फत्तेपूर,मऱ्हळ, सुरेगाव, कनकोरी, मानोरी, नांदलरशिंगोटे येथील विद्यार्थी दोडी व सिन्नर येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. या मार्गावरील निऱ्हाळे मुक्कामाची बस व इतर फेऱ्या लवकर सुरू कराव्या अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी