शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:46 IST

निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांसह पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची अडचण

निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांसह पालकांनी केली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या पध्दतीने शिक्षण घेण्यात अडचणीला सामोरे जावे लागले.

ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची अडचण, त्यातच आधी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाकडे ॲण्ड्रॉईड मोबाइलचा अभाव आणि नियमित शेतीकामे यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमध्ये जॉईन होणे अवघड होत होते. निऱ्हाळे -सिन्नर या मार्गावर सध्या दोन बसफेऱ्या सुरू आहेत. त्यात मुख्य निऱ्हाळे मुक्कामाची व सकाळी आठ, १२,२,४ अशा पूर्वीप्रमाणे बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातील प्रवाशी वर्गाने केली आहे.

सकाळी ६ :४५ च्या बसने निऱ्हाळे, फत्तेपूर,मऱ्हळ, सुरेगाव, कनकोरी, मानोरी, नांदलरशिंगोटे येथील विद्यार्थी दोडी व सिन्नर येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. या मार्गावरील निऱ्हाळे मुक्कामाची बस व इतर फेऱ्या लवकर सुरू कराव्या अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी