शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

करपा रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 15:14 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनॅशनल आदिवासी फेडरेशनच्यावतीने तहसिलदारांना निवेदन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.एकीकडे कोरोनाचे संकट त्यात कर्जबाजारी होऊन का होईना शेती मशागतीची कामे पूर्ण करून भात शेतीची लागवड केली आणि मध्येच आता करपा रोगाचे शेतकºयांच्या मुळावर आलेले उभे संकट यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकºयांना फक्त शासनाच्या पंचनामे आणि नुकसान भरपाईचीच आशा आहे. नुकसान झालेल्या भात शेतीची प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करून सदर नुकसानग्रस्त पिकांची शासनाने पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे यांनी निवेदनाद्वारे इगतपुरीचे तहसीलदार यांना दिले.या वेळी पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी, आदिवासी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम वारघडे, राम शिंदे, गणेश कवटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.प्रतिक्रि या...एकीकडे शेतकरी समृद्ध झाला असा बडेजाव अनेक नेतेमंडळी करतात परंतू करपा रोगामुळे अनेक शेतकर्यांची भात शेती संपुष्टात आली तरी सुद्धा एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी अद्यापही शेतकर्यांच्या बांधावर सुद्धा गेला नाही. प्रशासनाने त्विरत प्रत्यक्षात नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शेतकर्यांना दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी तरच खर्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल.- डॉ. श्रीराम लहामटे. युवा राज्य अध्यक्ष, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी