शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

निवडणूककामी नियुक्त राखीव कर्मचाऱ्यांची मानधनाची मागणी

By admin | Updated: April 5, 2017 00:23 IST

येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राखीव असणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. या कर्मचाऱ्यांनी मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे.

येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राखीव असणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. या कर्मचाऱ्यांनी मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्यापूर्वी येवला तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खासगी संस्थांतील व जिल्हा परिषदेमधील एकूण ११०४ कर्मचाऱ्यांची निवडणूककामी नियुक्ती केली होती. यासाठी कार्यालयाने निवडणूक कार्यात १००२ व राखीव म्हणून १०२ असे ११०४ कर्मचारी नियुक्त केले होते. नियमित कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज आटोपल्यानंतर ताबडतोब मानधन देण्यात आले. परंतु काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते. याची कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. सदर कर्मचारी निवडणूक कामातील नियोजनाप्रमाणे मार्गदर्शन घेतले. प्रत्येक बैठकीसाठी उपस्थित होते. तशी नोंदही उपस्थिती पत्रकात आहे. परंतु या कर्मचाऱ्यांचे निवडणूक आदेश तहसील कार्यालयाने २१ रोजी जमा केले व ते आदेश रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु ऐनवेळी राखीव जाहीर करण्यात आलेले कर्मचारी दिनांक ३१ जानेवारी, व ९ व २० फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रशिक्षण व बैठकीसाठी कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते. परंतु सदर कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामाचे मानधन तहसील कार्यालयाने महिन्यानंतरही अदा केले नाही. याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे या तत्कालीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सदर कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. इतर तालुक्यांमध्ये सर्व राखीव कर्मचाऱ्यांचे मानधन तत्काळ अदा केले गेले, मात्र येवला तालुक्यात उशीर का, असा सवाल कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)