शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:53 IST

येवला : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले असून, राज्यातील व परराज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू असल्याने दिवसेंदिवस ...

ठळक मुद्देउषा शिंदे यांचे राज्य शासनाला निवेदन

येवला : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले असून, राज्यातील व परराज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू असल्याने दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा व बाजार हस्तक्षेप योजना राबवून हमीभाव व शेतकºयांना मिळणारा भाव यातील फरकाची रक्कम किंवा अनुदान रक्कम शेतकºयास द्यावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.येवला बाजार आवारात बुधवारी (दि.५) उन्हाळ कांद्याचे भाव किमान २०० ते कमाल ६९०, तर सरासरी ४२५ रुपये प्रतिक्विंटल होते. तर लाल कांद्याचे भाव किमान ४०० ते कमाल ९३०, तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल होते.मार्च, एप्रिलमध्ये चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्यास ७ ते ८ महिने झाल्याने कांद्याची प्रत घसरली आहे. यामुळे उन्हाळ कांद्यास मागणी कमी झाली आहे.शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा तसेच बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत शेतकºयांना मिळणारा भाव व हमीभाव यातील फरक द्यावा, अशी मागणी उषा शिंदे यांनी निवेदनात केली आहे.भाव वाढतील या आशेने साठवून ठेवलेल्या कांद्यास उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन तसेच बँका किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेतकºयाने कांद्यासारख्या नगदी पिकाचे उत्पादन घेतले. परंतु चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसून येत आहे.