उमराणे : कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयामुळे द्याने परिसरात तीव्र पडसाद उमटले. महागडे बियाणे, मजुरी, पावसाळा लांबल्यामुळे परिसरातील बळीराजा चिंताग्रस्त होता व त्यातच आणखी कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट केल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत असा नाराजीचा सूर उमटला आहे. ग्राहकांच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत कांदा समाविष्ट झाल्याने व्यापारी आणि खुद्द शेतकरी साठवणूक करूशकत नाही. डाळिंबावरील तेल्या व मर रोगांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना डाळींब बागांवर नांगर फिरवावा लागत आहे.
कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
By admin | Updated: July 8, 2014 01:11 IST