शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शेतकऱ्यांसाठी पूर्वीच्या योजना पूर्ववत ठेवण्याची मागणी

By admin | Updated: November 2, 2015 23:40 IST

शेतकऱ्यांसाठी पूर्वीच्या योजना पूर्ववत ठेवण्याची मागणी

येवला : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकृषी संचार योजनेचे समायोजन करून नवीन येणारी योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पूर्वीच्या तीनही योजना पूर्ववत सुरू ठेवून नव्याने येणाऱ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अधिक लाभ द्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉँग्रेसने तहसीलदार शरद मंडलिक व बीएसएनएलचे उपमंडल अधिकारी अविनाश पाटील यांच्याकडे केली आहे.कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढावा, संपर्काचे अडथळे दूर होऊन त्यांच्यात कमी खर्चात व सवलतीच्या दरात समन्वय साधला जावा, या हेतूने तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी संचार योजना सुरू केली होती. यापूर्वीचे सर्व कृषी ग्राहकांना १०९, १०८, १२८ असे मासिक भाडे होते. यामध्ये ग्राहकांना ग्रुप अंतर्गत बोलणे मोफत, इतर नेटवर्कसाठी ४०० मिनिटे , बीएसएनएल ते बीएसएनएल ग्राहकासाठी १०० मिनिटे, एसएमएस इतर किंवा बीएसएनएल ग्राहकासाठी ४०० एसएमएस, १ जी बी इंटरनेट मिळत होते. परंतु आता बीएसएनएल ने तीनही योजनाचे समायोजन करून नवीन कृषी कार्ड योजना सुरू केली आहे. कृषी संचार योजनेच्या विद्यमान शेतकरी ग्राहकांना घेता गेल्या ५ वर्षापासून सुरु असलेल्या योजनेचे समायोजन करून शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा डाव सरकारचा आहे. समायोजनाच्या नावाखाली नव्याने येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्याची आर्थिक लुट व फसवणूक करत आहे. तत्कालीन सरकारची कृषी संचार योजना शेतकऱ्यामध्ये विशेष लोकिप्रय होती. त्यामुळे सत्ताधारी सरकारने सूडबुद्धीने योजना बंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर साहेबराव मढवई, दीपक लोणारी, सुदाम सोनवणे आदिसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.