शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कर्जमाफी देण्याची कृषी समितीची मागणी

By admin | Updated: June 2, 2017 00:55 IST

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पाठिंबा देण्याचा ठराव बैठकीत एकमुखाने संमत केला

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पाठिंबा देण्याचा ठराव बैठकीत एकमुखाने संमत केला. तसेच शासनाने संपाची त्वरित दखल घेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आली.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती तथा उपाध्यक्ष नयना गावित यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांच्या राज्यातील संपाला पाठिंबा देण्याचा ठराव महेंद्रकुमार काले यांनी मांडला. तो संमत करण्यात आला. कृषी विभागाच्या योजनांचे शेतकरी लाभार्थ्यांना दिलेले जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याच्या तक्रारी असून, यापुढे कृषी योजनांचा निधी राष्ट्रीयीकृत बॅँकेत ठेवण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदानही राष्ट्रीयीकृत बॅँकेतच जमा करण्यात यावे, याबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याने कार्यालयात थांबून शेतकऱ्यांना भेट द्यावी, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, तसेच त्यांचे नाव व मोबाइल क्रमांक घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. शेतकरी हा जगाचा ‘पोशिंदा’ असल्याचे नयना गावित यांनी सांगितले. पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची कामे झाली. परंतु एकही तळ्यांत पाणी साचलेले नाही. ही कामे अधिकाऱ्यांनीच ठेकेदारांच्या संगनमताने केल्याचा आरोप बैठकीत पेठच्या सदस्यांनी केला. बैठकीस महेंद्रकुमार काले, सुवर्णा गांगोडे, ज्योती वाघले, पुष्पा गवळी, ज्योती राऊत, एकनाथ गायकवाड, नीलेश केदार, जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे, कृषी विकास अधिकारी अभिजीत जमदाडे आदी उपस्थित होते.