शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नाशिक बाजार समिती बरखास्तीची मागणी

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक गैरव्यवहार घडले असतानादेखील आजवर आघाडी सरकारने बाजार समितीच्या दोषी संचालकांना पाठीशी घातले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक गैरव्यवहार घडले असतानादेखील आजवर आघाडी सरकारने बाजार समितीच्या दोषी संचालकांना पाठीशी घातले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने बाजार समितीच्या गेल्या वीस वर्षांतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी आणि त्यात गैरव्यवहार आढळल्यास संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी भाजपाच्या मनोगत या नियतकालिकाचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी केली आहे.  अमृतकर यांनी यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सविस्तर निवेदन दिले आहे. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल १४०० कोटी रुपयांची असून, उत्पन्न सुमारे चौदा कोटी आहे. समितीवर शिखर बॅँकेचे पन्नास कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. गेल्या वीस वर्षांत संचालकांचा कारभार वादग्रस्त राहिला आहे.  बाजार समितीची जप्त मालमत्ताही परस्पर विक्री करण्याचे प्रयत्न केले, परंतु राज्य शिखर बॅँकेने त्यांच्यावर कारवाई न करता संरक्षण दिले, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दोन वर्षांची आर्थिक पत्रके तयार नसणे, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केलेल्या ५७ लाख रुपयांच्या रकमेची वस्तुस्थिती या सर्वांचा विचार करता बाजार समितीच्या सर्व नुकसानीची सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी, अशी मागणी अमृतकर यांनी केली आहे. पुरेसे उत्पन्न असतानाही संचालकांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतमालाची चोरी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळालेल्या मोबदल्याची लूटमार, असे प्रकार होत असतात. बाजार समितीकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हेत्या. परंतु त्या रेडीरेकनरपेक्षा कमी दरात विकून संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत.