शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:11 IST

मार्च २०२० पासून सर्व नागरिक कोरोनाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व जण आपापल्या परीने योगदान देत आहेत. शिक्षक ...

मार्च २०२० पासून सर्व नागरिक कोरोनाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व जण आपापल्या परीने योगदान देत आहेत. शिक्षक कर्मचारीही स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. रेल्वे, बसस्थानक, चेक पोस्ट, विलगीकरण कक्षावरील नेमणूक, वॉर रूम, निवडणुकांची कामे याबरोबरच रेशन दुकानदार म्हणूनही शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यासोबतच शिक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना मात्र अद्यापही कोणतीही मदत मिळाली नाही. यापैकी बहुतांश शिक्षक कर्मचारी आपले मूळ गाव सोडून इतर जिल्ह्यांत कामाला आहेत. राज्यभर अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शासनाने आता शिक्षकांना सुट्टी जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

इन्फो

शिक्षकांवर वाढता ताण

कोरोनामुळे गेले वर्षभर शिक्षक व कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ गावी जाता आले नाही. आईवडील, नातेवाईक, कुटुंबीय यांच्या सुखदुःखात सहभागी होता आले नाही. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द झाल्या आहेत. निकालाची कामे सुरू आहेत. शिक्षकांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्ग बंद करून सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची गरज आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.