शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

मालेगाव जिल्हा निर्मिती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील ...

खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. मात्र, मालेगाव जिल्ह्याची उपेक्षा होत असल्याने नागरिक चळवळ उभारून मोठा संघर्ष करणार आहेत. मालेगाव जिल्हा झाल्यास चाळीस वर्षाची प्रतीक्षा फळाला येणार असल्याने तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर होणार आहे. तसं पाहता मालेगाव तालुक्याने अनेक जनसेवक लोकप्रतिनिधी मंत्री पदापर्यंत पोहोचवले आहेत. मात्र अद्यापही मालेगाव जिल्हा प्रतीक्षेत आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी अगोदर मोठ्या प्रमाणात प्रयत्नही झाले मात्र इतर तालुक्यांची जिल्ह्यांची निर्मिती झाल्यानंतरही मालेगावचा नंबर अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहे. यासाठी मोठमोठ्या नेत्यांनी घोषणांचा पाऊस पाडला होता मात्र, या घोषणा अद्याप फलित झालेल्या नसल्याने नागरिकांनी मालेगाव जिल्ह्यासाठी पुन्हा आंदोलन किंवा उपोषण करण्याची तयारी दर्शविली आहे. तालुक्यातून नागरिक मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधींकडे जिल्हा निर्मितीसाठी डोळे लावून बसले आहेत. मात्र ही स्थिती अद्यापही बदलायच्या मार्गात नसल्याने यासाठी पुन्हा चळवळ सुरु होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालेगाव जिल्हा करण्यासाठी अजून किती दिवस प्रयत्न करावे लागणार आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. नुसती वचनं दिली जात असताना मालेगाव जिल्ह्याकडे नागरिकांच्या सुविधा म्हणून पाहिले तरच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अन्यथा मालेगाव जिल्हा हे पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरत नाही असा विश्वास नागरिकांना पटणार आहे.

मालेगाव जिल्ह्यासाठी पूर्वी अनेक लोकांनी आपले योगदान दिले असले तरी महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याच्या यादीत अद्याप कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नसल्याने मालेगावला सापत्न वागणूक दिली जाते काय असेच म्हणावे लागणार आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत ७० ते ८० टक्के कार्यालय जिल्हास्तरीय असले तरी त्यांची कार्यवाही परिपूर्ण करण्यासाठी नाशिक वारी करावी लागते .यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

-------------------------

रोजगाराविना बेराेजगार

महाराष्ट्र औद्योगिक वसाहत

महाराष्ट्र औद्योगिक वसाहत पूर्वीची मंजूर असतानाही सद्यस्थितीची जागा बदलूनही गुंतवणूकदार अद्याप जमीन खरेदी करून उद्योग सुरू करण्यास धजावत नाही. यामुळे मालेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना कुठल्याही प्रकारच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर मालेगाव जिल्हा करण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.