शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मालेगाव जिल्हा निर्मिती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील ...

खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. मात्र, मालेगाव जिल्ह्याची उपेक्षा होत असल्याने नागरिक चळवळ उभारून मोठा संघर्ष करणार आहेत. मालेगाव जिल्हा झाल्यास चाळीस वर्षाची प्रतीक्षा फळाला येणार असल्याने तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर होणार आहे. तसं पाहता मालेगाव तालुक्याने अनेक जनसेवक लोकप्रतिनिधी मंत्री पदापर्यंत पोहोचवले आहेत. मात्र अद्यापही मालेगाव जिल्हा प्रतीक्षेत आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी अगोदर मोठ्या प्रमाणात प्रयत्नही झाले मात्र इतर तालुक्यांची जिल्ह्यांची निर्मिती झाल्यानंतरही मालेगावचा नंबर अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहे. यासाठी मोठमोठ्या नेत्यांनी घोषणांचा पाऊस पाडला होता मात्र, या घोषणा अद्याप फलित झालेल्या नसल्याने नागरिकांनी मालेगाव जिल्ह्यासाठी पुन्हा आंदोलन किंवा उपोषण करण्याची तयारी दर्शविली आहे. तालुक्यातून नागरिक मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधींकडे जिल्हा निर्मितीसाठी डोळे लावून बसले आहेत. मात्र ही स्थिती अद्यापही बदलायच्या मार्गात नसल्याने यासाठी पुन्हा चळवळ सुरु होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालेगाव जिल्हा करण्यासाठी अजून किती दिवस प्रयत्न करावे लागणार आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. नुसती वचनं दिली जात असताना मालेगाव जिल्ह्याकडे नागरिकांच्या सुविधा म्हणून पाहिले तरच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अन्यथा मालेगाव जिल्हा हे पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरत नाही असा विश्वास नागरिकांना पटणार आहे.

मालेगाव जिल्ह्यासाठी पूर्वी अनेक लोकांनी आपले योगदान दिले असले तरी महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याच्या यादीत अद्याप कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नसल्याने मालेगावला सापत्न वागणूक दिली जाते काय असेच म्हणावे लागणार आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत ७० ते ८० टक्के कार्यालय जिल्हास्तरीय असले तरी त्यांची कार्यवाही परिपूर्ण करण्यासाठी नाशिक वारी करावी लागते .यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

-------------------------

रोजगाराविना बेराेजगार

महाराष्ट्र औद्योगिक वसाहत

महाराष्ट्र औद्योगिक वसाहत पूर्वीची मंजूर असतानाही सद्यस्थितीची जागा बदलूनही गुंतवणूकदार अद्याप जमीन खरेदी करून उद्योग सुरू करण्यास धजावत नाही. यामुळे मालेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना कुठल्याही प्रकारच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर मालेगाव जिल्हा करण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.