शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मालेगाव जिल्हा निर्मिती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील ...

खडकी : शेतकरी व नागरी सुविधांसाठी जिल्हास्तरीय कार्यालयांची आवश्यकता भासत असल्याने मालेगाव जिल्हा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. मात्र, मालेगाव जिल्ह्याची उपेक्षा होत असल्याने नागरिक चळवळ उभारून मोठा संघर्ष करणार आहेत. मालेगाव जिल्हा झाल्यास चाळीस वर्षाची प्रतीक्षा फळाला येणार असल्याने तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर होणार आहे. तसं पाहता मालेगाव तालुक्याने अनेक जनसेवक लोकप्रतिनिधी मंत्री पदापर्यंत पोहोचवले आहेत. मात्र अद्यापही मालेगाव जिल्हा प्रतीक्षेत आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी अगोदर मोठ्या प्रमाणात प्रयत्नही झाले मात्र इतर तालुक्यांची जिल्ह्यांची निर्मिती झाल्यानंतरही मालेगावचा नंबर अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहे. यासाठी मोठमोठ्या नेत्यांनी घोषणांचा पाऊस पाडला होता मात्र, या घोषणा अद्याप फलित झालेल्या नसल्याने नागरिकांनी मालेगाव जिल्ह्यासाठी पुन्हा आंदोलन किंवा उपोषण करण्याची तयारी दर्शविली आहे. तालुक्यातून नागरिक मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधींकडे जिल्हा निर्मितीसाठी डोळे लावून बसले आहेत. मात्र ही स्थिती अद्यापही बदलायच्या मार्गात नसल्याने यासाठी पुन्हा चळवळ सुरु होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालेगाव जिल्हा करण्यासाठी अजून किती दिवस प्रयत्न करावे लागणार आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. नुसती वचनं दिली जात असताना मालेगाव जिल्ह्याकडे नागरिकांच्या सुविधा म्हणून पाहिले तरच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अन्यथा मालेगाव जिल्हा हे पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरत नाही असा विश्वास नागरिकांना पटणार आहे.

मालेगाव जिल्ह्यासाठी पूर्वी अनेक लोकांनी आपले योगदान दिले असले तरी महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याच्या यादीत अद्याप कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नसल्याने मालेगावला सापत्न वागणूक दिली जाते काय असेच म्हणावे लागणार आहे. मालेगाव जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत ७० ते ८० टक्के कार्यालय जिल्हास्तरीय असले तरी त्यांची कार्यवाही परिपूर्ण करण्यासाठी नाशिक वारी करावी लागते .यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

-------------------------

रोजगाराविना बेराेजगार

महाराष्ट्र औद्योगिक वसाहत

महाराष्ट्र औद्योगिक वसाहत पूर्वीची मंजूर असतानाही सद्यस्थितीची जागा बदलूनही गुंतवणूकदार अद्याप जमीन खरेदी करून उद्योग सुरू करण्यास धजावत नाही. यामुळे मालेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना कुठल्याही प्रकारच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर मालेगाव जिल्हा करण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.