शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी

By admin | Updated: April 7, 2017 23:08 IST

सिन्नर : आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 सिन्नर : पंडित दीनदयाळ योजनेस स्थगिती देऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे, उल्हासनगर येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे बंद करण्याचे आदेश प्रकल्प कार्यालयातून गृहपालांमार्फत देण्यात आले असून, विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे निवेदन म्हटले आहे.आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेत सातत्य नाही. निर्वाह भत्ता वेळेत मिळत नाही, शिष्यवृत्ती वेबसाइट शैक्षणिक वर्ष संपले तरी चालू होत नाही यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दीनदयाळ योजनेची रक्कम खात्यावर वेळेत जमा न झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून गावी परतावे लागण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.परीक्षेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हातातील पुस्तके बाजूला ठेवून वसतिगृहे वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष देवराम खेताडे, महिला प्रतिनिधी यमुनाबाई भांगरे, कार्याध्यक्ष भगवान तळपाडे, शहराध्यक्ष रोहित मुठे, विजय मुठे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)