शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: August 19, 2014 01:20 IST

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

गुळवंच : कृषी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी ‘बांधावर खत’ योजना तालुक्यात प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.तालुका कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तालुक्यात शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमांतून शासनाकडून रास्त दरातील खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वितरित करण्याची ही योजना आहे. गटातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. मात्र यंदा सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील शेतकरी गटांना खते उपलब्ध झाली नसल्याने बांधावर सोडाच, परंतु शेतकऱ्यांना खतांसाठी थेट सिन्नर येथे जावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून माफक दरात खते मिळावी व विक्रेत्यांकडून होणारी कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून थेट कंपनीकडून शेतकरी गटांना खते मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकरी गटांना शासनाकडून खतांचा पुरवठा करण्यात येतो. तो गटांमार्फत शेतकऱ्यांना थेट बांधावर खत उपलब्ध होते. तथापि, शासनाकडून या गटांना विविध रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे काही पिकांच्या पेरण्या सुरू असून, विविध भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडी करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच पेरणी केली आहे ती पिके कोळपणी, निंदणीवर आली आहेत. त्यामुळे निंदणी झाल्यानंतर पिकांना खतांची मात्रा देण्याची गरज असते. मात्र खते मिळत नसल्याने पिकांचे पोषण होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)