शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: August 19, 2014 01:20 IST

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

गुळवंच : कृषी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी ‘बांधावर खत’ योजना तालुक्यात प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.तालुका कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तालुक्यात शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमांतून शासनाकडून रास्त दरातील खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वितरित करण्याची ही योजना आहे. गटातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. मात्र यंदा सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील शेतकरी गटांना खते उपलब्ध झाली नसल्याने बांधावर सोडाच, परंतु शेतकऱ्यांना खतांसाठी थेट सिन्नर येथे जावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून माफक दरात खते मिळावी व विक्रेत्यांकडून होणारी कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून थेट कंपनीकडून शेतकरी गटांना खते मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकरी गटांना शासनाकडून खतांचा पुरवठा करण्यात येतो. तो गटांमार्फत शेतकऱ्यांना थेट बांधावर खत उपलब्ध होते. तथापि, शासनाकडून या गटांना विविध रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे काही पिकांच्या पेरण्या सुरू असून, विविध भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडी करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच पेरणी केली आहे ती पिके कोळपणी, निंदणीवर आली आहेत. त्यामुळे निंदणी झाल्यानंतर पिकांना खतांची मात्रा देण्याची गरज असते. मात्र खते मिळत नसल्याने पिकांचे पोषण होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)