शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी

By admin | Updated: April 23, 2017 01:18 IST

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील मोसम नदीकाठावरील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील उन्हाळी हंगामातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.हरणबारी धरणापासून ते मालेगावपर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त गावे मोसम नदीकाठावर वसलेले आहेत. या सर्वच गावांचा पाणीपुरवठा हा या धरणावर आधरित आहे. आज या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांसह मुक्या जनावरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मोसम खोऱ्यातील मोठे गाव नामपूरलाही दहा दहा दिवसा पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. मोसम नदीकाठावरील अनेक गावांत टॅँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू असून, खासगी पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आदिवासी व गरीब जनतेला हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनसुद्धा पाणीपुरवठा करण्यास हतबल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हरणबारी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले, तर उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर होऊन सर्वसामान्यांचे हाल कमी होणार आहेत. संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतिन पगार यांच्यासह नामपूरच्या सरपंच सोनाली निकम, बाजीराव सावंत, दगाजी बच्छाव, सुनील अलई, शशिकांत कोर यांनी केली आहे. (वार्ताहर)