शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी

By admin | Updated: April 23, 2017 01:18 IST

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील मोसम नदीकाठावरील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील उन्हाळी हंगामातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.हरणबारी धरणापासून ते मालेगावपर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त गावे मोसम नदीकाठावर वसलेले आहेत. या सर्वच गावांचा पाणीपुरवठा हा या धरणावर आधरित आहे. आज या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांसह मुक्या जनावरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मोसम खोऱ्यातील मोठे गाव नामपूरलाही दहा दहा दिवसा पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. मोसम नदीकाठावरील अनेक गावांत टॅँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू असून, खासगी पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आदिवासी व गरीब जनतेला हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनसुद्धा पाणीपुरवठा करण्यास हतबल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हरणबारी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले, तर उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर होऊन सर्वसामान्यांचे हाल कमी होणार आहेत. संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतिन पगार यांच्यासह नामपूरच्या सरपंच सोनाली निकम, बाजीराव सावंत, दगाजी बच्छाव, सुनील अलई, शशिकांत कोर यांनी केली आहे. (वार्ताहर)