शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी

By admin | Updated: April 23, 2017 01:18 IST

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील मोसम नदीकाठावरील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील उन्हाळी हंगामातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.हरणबारी धरणापासून ते मालेगावपर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त गावे मोसम नदीकाठावर वसलेले आहेत. या सर्वच गावांचा पाणीपुरवठा हा या धरणावर आधरित आहे. आज या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांसह मुक्या जनावरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मोसम खोऱ्यातील मोठे गाव नामपूरलाही दहा दहा दिवसा पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. मोसम नदीकाठावरील अनेक गावांत टॅँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू असून, खासगी पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आदिवासी व गरीब जनतेला हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनसुद्धा पाणीपुरवठा करण्यास हतबल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हरणबारी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले, तर उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर होऊन सर्वसामान्यांचे हाल कमी होणार आहेत. संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतिन पगार यांच्यासह नामपूरच्या सरपंच सोनाली निकम, बाजीराव सावंत, दगाजी बच्छाव, सुनील अलई, शशिकांत कोर यांनी केली आहे. (वार्ताहर)