शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नाशिकसाठी कृषी विद्यापीठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

नाशिक : विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्हयांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून, राज्य सरकारने नाशिकमध्ये अशाप्रकारचे ...

नाशिक : विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्हयांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून, राज्य सरकारने नाशिकमध्ये अशाप्रकारचे कृषी विद्यापीठ उभारण्याची मागणी होत आहे. तसेच नाशिक कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून, येथे कृषी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित होण्यासाठी कृषी विदयापीठ होणे आ‌वश्यक असल्याचा सूर शेती क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

विद्युत रोहित्र वेलीच्या विळख्यात

नाशिक : इंदिरानगर परिसरातील विद्युत रोहित्रांना वेलींनी वेढले असून, या वेली उन्हामुळे वाळल्या आहेत. या वाळलेल्या वेलींना शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून आग लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनपेक्षित घटना टाळण्यासाठी विद्युत रोहित्रांच्या परिसरातील वाळलेले गवत आणि वेली हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

---

रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार

नाशिक : इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून शरयू नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर परिसरातील व्यावसायिक व किरकोळ विक्रेत्यांकडून कचरा फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. यात शिळे अन्न व भाजीपाल्यासारख्या नाशवंत पदार्थांचा समावेश असल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिकांकडून हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.

--

नासर्डी नदीला प्रदूषणाचा विळखा

नाशिक : नासर्डी नदीत प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा फेकला जात असल्याने या नदीला प्रदूषणाने विळखा घातला आहे. त्याचप्रकारे ठिकठिकाणी रहिवासी वसाहतींमधून निघणारे पाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्यानेही नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नासार्डी नदी परिसरात यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

---

शहरात दुकाने बंद, पानटपऱ्या सुरू

नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद असली तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक टपऱ्यांवर अवैधरित्या गुटखा अथवा सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. काही पानटपरीधारक टपरीजवळ थांबून येणाऱ्या ग्राहकांना तंबाखू व अन्य अमली पदार्थांची विक्री करत आहेत.

--

भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन

नाशिक : इंदिरानगर भागात भाजी विक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रथचक्र परिसर व अश्वमेध परिसरात भाजी विक्रेत्यांकडून मास्क आणि सॅनिटायझरसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

---

कर्ज हप्ते स्थगित करण्याची मागणी

नाशिक : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना गृह कर्जासह विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने बँकांना सूचना करून कर्जाचे एप्रिल व मे महिन्याचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

--