शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

नाशिकसाठी कृषी विद्यापीठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST

नाशिक : विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्हयांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून, राज्य सरकारने नाशिकमध्ये अशाप्रकारचे ...

नाशिक : विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्हयांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून, राज्य सरकारने नाशिकमध्ये अशाप्रकारचे कृषी विद्यापीठ उभारण्याची मागणी होत आहे. तसेच नाशिक कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून, येथे कृषी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित होण्यासाठी कृषी विदयापीठ होणे आ‌वश्यक असल्याचा सूर शेती क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

विद्युत रोहित्र वेलीच्या विळख्यात

नाशिक : इंदिरानगर परिसरातील विद्युत रोहित्रांना वेलींनी वेढले असून, या वेली उन्हामुळे वाळल्या आहेत. या वाळलेल्या वेलींना शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून आग लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनपेक्षित घटना टाळण्यासाठी विद्युत रोहित्रांच्या परिसरातील वाळलेले गवत आणि वेली हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

---

रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार

नाशिक : इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून शरयू नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर परिसरातील व्यावसायिक व किरकोळ विक्रेत्यांकडून कचरा फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. यात शिळे अन्न व भाजीपाल्यासारख्या नाशवंत पदार्थांचा समावेश असल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिकांकडून हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.

--

नासर्डी नदीला प्रदूषणाचा विळखा

नाशिक : नासर्डी नदीत प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा फेकला जात असल्याने या नदीला प्रदूषणाने विळखा घातला आहे. त्याचप्रकारे ठिकठिकाणी रहिवासी वसाहतींमधून निघणारे पाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्यानेही नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नासार्डी नदी परिसरात यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

---

शहरात दुकाने बंद, पानटपऱ्या सुरू

नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद असली तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक टपऱ्यांवर अवैधरित्या गुटखा अथवा सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. काही पानटपरीधारक टपरीजवळ थांबून येणाऱ्या ग्राहकांना तंबाखू व अन्य अमली पदार्थांची विक्री करत आहेत.

--

भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन

नाशिक : इंदिरानगर भागात भाजी विक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रथचक्र परिसर व अश्वमेध परिसरात भाजी विक्रेत्यांकडून मास्क आणि सॅनिटायझरसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

---

कर्ज हप्ते स्थगित करण्याची मागणी

नाशिक : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना गृह कर्जासह विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने बँकांना सूचना करून कर्जाचे एप्रिल व मे महिन्याचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

--