शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

अकरावीसाठी १० टक्के वाढीव जागांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नाशिक : शहर व जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (दि. ४) सुरू झाली आहेत. मात्र अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून ...

नाशिक : शहर व जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (दि. ४) सुरू झाली आहेत. मात्र अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जवळच्या भागातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहा टक्के जागा वाढवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचा मोठा कालावधी वाया गेला असून प्रवेश प्रक्रियेलाही विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अजून अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानित जागांचा कोटा पूर्ण झाला असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. या विद्यार्थ्यांसाठी परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा वाढवून देण्याची मागणी मनविसेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालक कार्यालयाला प्रस्तावही सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप व ललित वाघ, सरचिटणीस प्रशांत बारगळ, अभिषेक सोनार, आदित्य कुलकर्णी, राहुल बोराडे, विशाल चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.