शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिककरांची विमानसेवेसाठी दिल्लीला पसंती

By admin | Updated: July 29, 2015 01:09 IST

सर्वेक्षण : नव्या सेवेसंदर्भात शनिवारी बैठक

नाशिक : ओझर येथील विमानतळ नागरी हवाई सेवेसाठी खुला झाल्यानंतर त्यावरून मुंबई- पुण्यापेक्षा दिल्लीपर्यंत सेवा सुरू करण्यासाठी नाशिककरांनी कौल दिला आहे. अर्थात, हे सर्वेक्षण अद्याप सुरूच असून, एक हजार नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे यासाठी ट्रॅव्हल एजंट्स आॅफ नाशिक म्हणजे ‘तान’ या संस्थेच्या वतीने सुरू आहेत. येत्या १ आॅगस्ट रोजी एचएएलने विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची बैठक बोलविली असून, त्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात येत आहे.ओझर विमानतळावर पॅसेंजर टर्मिनल इमारत बांधून एक वर्ष झाले तरी येथून नियमित सेवा सुरू झालेली नाही. मध्यंतरी सी-प्लेन चालविणाऱ्या मेहेर कंपनीने नाशिक-पुणे ही सेवा सुरू केली असली तरी ती महागडी तर होतीच शिवाय एचएएलच्या तांत्रिक अडचणींमुळे ती स्थगित करण्यात आली आहे. श्रीनिवास एअरलाइन्स या नाशिकच्याच कंपनीने मुंबई-नाशिक - पुणे सेवा सुरू केली असली तरी तूर्तास मुंबई-नाशिक अशीच सेवा असून, तीन आॅगस्टपासून एचएएलची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर ही सेवा सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याशिवाय कंपनीने मुंबई- नाशिक-सुरत सेवेची तयारी केली आहे. तथापि, नाशिककरांना कोणत्या ठिकाणी विमानसेवा गरजेची वाटते, यावरून तिची व्यवहार्यता ठरणार आहे. नाशिकमधून हवाई सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या अनेक कंपन्यांशी चर्चा करण्यासाठी एचएएलने शनिवारी (दि.१) बैठक बोलाविली असून त्यात एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, गोएआर, स्पाइस जेट, इंडिगो अशा अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळी होणाऱ्या चर्चेत नाशिककरांना नेमक्या कोणत्या ठिकाणी विमानसेवेचा लाभ घ्यायला हवा, यासाठी माहिती संकलन करण्यात येत असून त्यासाठीच ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन आॅफ नाशिकने आॅनलाइन सर्व्हे सुरू केला आहे. गेल्या तीन दिवसात पावणे चारशे नागरिक यात सहभागी झाले आहेत. त्यापैकी ६० टक्के नागरिकांनी नाशिक ते दिल्ली अशा हवाई सेवेला पसंती दिली आहे. (प्रतिनिधी)