शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
3
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
4
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
5
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
6
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
7
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
8
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
9
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
10
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
11
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
12
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
13
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
14
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
15
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
16
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
17
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
18
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
19
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
20
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

आजीबाईंचा बटवा अन‌् कोरोनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:14 IST

सर्दी, खोकला, दमा, ताप आलेल्या व्यक्ती प्राणायम, दीर्घ श्वसन, कपालभाती प्राणायम करीत आहेत. आजीने सांगितल्यानुसार दिवसातून एकदा आल्याचा ...

सर्दी, खोकला, दमा, ताप आलेल्या व्यक्ती प्राणायम, दीर्घ श्वसन, कपालभाती प्राणायम करीत आहेत.

आजीने सांगितल्यानुसार दिवसातून एकदा आल्याचा किस त्यावर लिंबू रस आणि सैंधव मीठ टाकून जेवताना चावून खाण्यास दिले जात आहे. पिण्याच्या पाण्यात सोन्याची गिनीं टाकून उकळून सोसवेल इतके कोमट पाणी दिले जातेय.

नाकात खोबरेल तेलाचे दोन थेंब टाकले जात आहेत. सर्दी झाल्यास अद्रक साजूक तुपात तळून त्याचे तुकडे दिवसभर चघळावेत, अद्रक, दालचिनी, काळीमिरी, लवंग तोंडात ठेवावे, चावून खाऊ नये. त्याच्या रसाचे सेवन करावे. तुळशीचे पान आणि खडीसाखर चावून खावी. सुका मेवा, गाईचे तूप यांचा वापर करावा.

कशाचा काय उपयोग

१) खोकला आल्यास आल्याचा रस काढून त्यात मध टाकून चाटण घ्यावे त्यामुळे आराम मिळतो. तीन दिवस हा प्रयोग करावा. २) सर्दी घालवण्यासाठी साजूक तुपात अद्रक तळून घ्यावे. नंतर त्याचे तुकडे तोंडात ठेवावेत, काही वेळानंतर चावून खाऊन घ्यावे.

३) ओवा तव्यावर भाजून कापडात बांधावा. त्याने गळा, नाक आणि छाती शेकवावी. याचा लहान मुलांना फायदा होतो. कफ लवकर बाहेर पडून छाती मोकळी होते.

डॉक्टरांची प्रतिक्रिया...

आजीबाईच्या बटव्यातील औषधींपैकी बऱ्याच गोष्टी आपल्या आहारात, फोडणीत रोज असतात. गरज आहे ती अन्न ताजे आणि वेळेवर आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय खाण्याची. शिळे, थंड झालेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील पौष्टिक आवश्यक घटक कमी होतात, मग फायदा कसा दिसेल? गरज, आवड आणि सोय यातील फरक समजून आहार घ्यावा. स्वच्छतेचा आग्रह, व्यायामात नियमितता आणि काळजी हे महत्त्वाचे. त्रास काय आणि किती होतोय हे बघून औषधे वापरावीत. अतिरेक नक्कीच नको. नाकात तीळ तेल / खोबरेल तेल / वैद्यांनी सुचविलेले औषधी तेल २-२ थेंब रोज २ वेळा टाकणे फायदेशीर राहील. आजारी असो वा नसो प्रत्येकाने खूश, आनंदी अन‌् उत्साही कसे राहता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे. या पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्याला निगेटिव्ह राहायला मदत करणाऱ्या असणार आहेत.

- डॉ. अपश्चिम सुगन बरंठ

आजींच्या प्रतिक्रिया...

सर्दी असल्यास रात्री हळद टाकून दूध गरम करून पिल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते. घरगुती औषधी काढा घ्यावा.

- निर्मला पवार

आमच्या लहानपणी आमची आजी घरगुती आयुर्वेदिक औषधे देत असे. त्यामुळे आम्हाला फारसे डॉक्टरकडे जावे लागत नसे. कफ झाल्यास गरम केलेले पाणी कोमट झाल्यावर प्यायला दिले जायचे. त्यामुळे उलट्या होऊन शरीरातील कफ निघून जायचा.

- चंद्रभागा सोनवणे

दोन ते तीन लीटर पाणी घेऊन त्यात लिंबूचे साल, आल्याचे तुकडे, दालचिनी टाकून पाणी उकळून घ्यावे, घरातील सर्व सदस्यांनी प्यावे. सकाळ-संध्याकाळ वाफ घ्यावी.

- लयलाबाई शेख

===Photopath===

250521\25nsk_34_25052021_13.jpg~250521\25nsk_35_25052021_13.jpg

===Caption===

निर्मला पवार~चंद्रभागा सोनवणे