शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पहिलीच्या पुस्तक छपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:11 IST

नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका

नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाची पुस्तके शाळांमधून मोफत दिली जातात. बालभारतीच्या राज्यातील आठ पाठ्यपुस्तके भांडार आणि वितरण केंद्राच्या माध्यमातून राज्यभर पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आला असून ३१ मे रोजीच संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असला तरी पहिलीची सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक पुस्तके छपाईची प्रक्रिया रेंगाळल्याने पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा कुठेही होऊ शकलेला नाही.वेळेत पुरवठा करणारपहिलीच्या पुस्तकांच्या छपाईची प्रक्रिया सुरू असली तरी सर्व शाळांना वेळेत पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. छपाईची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, कोणालाही त्यामुळे विलंब होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पहिलीची पुस्तके उपलब्ध होतील.- सुनील मगर, संचालक,

बालभारती यंदा पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. मात्र विज्ञान आणि बीजगणित वगळून इतर विषयांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे पहिलीच्या दोन पुस्तकांची छपाई पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा वितरणास विलंब झाला आहे. ३१ मेपर्यंत पुरवठा करण्यात येणार होता आणि ७ तारखेपर्यंत शाळांना वितरण केले जाणार होते. मात्र पहिलीच्या पुस्तकांना विलंब झाल्याने सर्वच पुस्तके घेऊन जाण्यासाठी शाळांना दोनदा तालुक्यातील केंद्रावर चकरा माराव्या लागणार आहेत.