शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

पहिलीच्या पुस्तक छपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:11 IST

नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका

नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाची पुस्तके शाळांमधून मोफत दिली जातात. बालभारतीच्या राज्यातील आठ पाठ्यपुस्तके भांडार आणि वितरण केंद्राच्या माध्यमातून राज्यभर पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आला असून ३१ मे रोजीच संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असला तरी पहिलीची सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक पुस्तके छपाईची प्रक्रिया रेंगाळल्याने पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा कुठेही होऊ शकलेला नाही.वेळेत पुरवठा करणारपहिलीच्या पुस्तकांच्या छपाईची प्रक्रिया सुरू असली तरी सर्व शाळांना वेळेत पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. छपाईची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, कोणालाही त्यामुळे विलंब होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पहिलीची पुस्तके उपलब्ध होतील.- सुनील मगर, संचालक,

बालभारती यंदा पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. मात्र विज्ञान आणि बीजगणित वगळून इतर विषयांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे पहिलीच्या दोन पुस्तकांची छपाई पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा वितरणास विलंब झाला आहे. ३१ मेपर्यंत पुरवठा करण्यात येणार होता आणि ७ तारखेपर्यंत शाळांना वितरण केले जाणार होते. मात्र पहिलीच्या पुस्तकांना विलंब झाल्याने सर्वच पुस्तके घेऊन जाण्यासाठी शाळांना दोनदा तालुक्यातील केंद्रावर चकरा माराव्या लागणार आहेत.