शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

पहिलीच्या पुस्तक छपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:11 IST

नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका

नाशिक : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असताना इयत्ता पहिलीच्या पुस्तकांची छपाईच पूर्ण झाली नसल्याने पुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आठ विभागीय भांडारांमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा वेळेत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार की नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाची पुस्तके शाळांमधून मोफत दिली जातात. बालभारतीच्या राज्यातील आठ पाठ्यपुस्तके भांडार आणि वितरण केंद्राच्या माध्यमातून राज्यभर पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आला असून ३१ मे रोजीच संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असला तरी पहिलीची सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक पुस्तके छपाईची प्रक्रिया रेंगाळल्याने पहिलीच्या पुस्तकांचा पुरवठा कुठेही होऊ शकलेला नाही.वेळेत पुरवठा करणारपहिलीच्या पुस्तकांच्या छपाईची प्रक्रिया सुरू असली तरी सर्व शाळांना वेळेत पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. छपाईची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, कोणालाही त्यामुळे विलंब होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पहिलीची पुस्तके उपलब्ध होतील.- सुनील मगर, संचालक,

बालभारती यंदा पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. मात्र विज्ञान आणि बीजगणित वगळून इतर विषयांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे पहिलीच्या दोन पुस्तकांची छपाई पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा वितरणास विलंब झाला आहे. ३१ मेपर्यंत पुरवठा करण्यात येणार होता आणि ७ तारखेपर्यंत शाळांना वितरण केले जाणार होते. मात्र पहिलीच्या पुस्तकांना विलंब झाल्याने सर्वच पुस्तके घेऊन जाण्यासाठी शाळांना दोनदा तालुक्यातील केंद्रावर चकरा माराव्या लागणार आहेत.