शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
2
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
3
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
4
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
5
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
6
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
7
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
8
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
9
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
10
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
11
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
12
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
13
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
14
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
15
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
16
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
17
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
18
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
19
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
20
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा

कर्जमाफीनंतर संभ्रम कायम

By admin | Updated: June 17, 2017 00:05 IST

सायखेडा : सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला असला तरी त्यातील निकष आणि अटी पहाता राज्यातील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी सलग आठ दिवस राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला होता, मात्र राज्यातील बहुतांशी शेतकरी हे मध्यभूधारक असल्याने सरसकट कर्जमाफी व्हायला हवी. मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आलेला सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला असला तरी त्यातील निकष आणि अटी पहाता राज्यातील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून, या संदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. कर्जमाफीला अवधी असल्याने शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीम देण्याचे आदेश शासनाने दिला असला तरी त्याचे निकष पहाता दहा हजार रुपये नको आणि कर्जमाफीलादेखील हेच निकष रहातील, असा अंदाज शेतकरी बांधत आहे. अशा अटी आणि निकष असल्यास शेतकरी कर्जमाफी देताच कशाला अशा संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या राजकीय नेत्यांना कर्जमाफी नसली तरी चालेल; मात्र सरकारी कर्मचारी असल्यास कर्जमाफी नाही, कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरी करत असल्याससुद्धा कर्जमाफी नाही तसेच नोंदणीकृत व्यवसाय असल्यास कर्जमाफी नाही याशिवाय चारचाकी गाडी असल्यासदेखील कर्जमाफी नाही, असे अनेक किचकट आणि वाटेल ते निकष लावून कर्जमाफी सरकार देणार असेल तर किती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हा संशोधनाचा विषय आहे.शेतीवरील कर्ज माफ केले पाहिजे. सरकारी नोकरी असो किंवा घरातील एखादा माणूस नोकरी करत असेल तर त्याचे कुटुंब चालत असेल मात्र शेती त्यांचीही तोट्यातच गेली आहे. चारचाकी गाडी कर्ज काढून घेतली असली तरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी सरकारकडे शेतकरी कर्जमाफी मागत  नाही तर शेतीवरील कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे कर्जमाफी हवी आहे.सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची गर्दीसायगाव : शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सायगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सायगाव येथील वि.का. सहकारी सोसायटीने कर्जदार सभासदांकडून सातबारा उतारा व आधारकार्ड या कागदपत्राची मागणी केल्याने सातबारा उतारा घेण्यासाठी परिसरातील धामणगाव, पांजरवाडी व सायगाव येथील शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसापासून सायगाव येथील शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गर्दी केली. आता सर्वांनाच कर्जमाफी मिळेल या आशेवर शेतकरी असून, शासनाने कोणतेही निकष न वापरता कर्ज बाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरपंच योगीता भालेराव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.