शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतर संभ्रम कायम

By admin | Updated: June 17, 2017 00:05 IST

सायखेडा : सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला असला तरी त्यातील निकष आणि अटी पहाता राज्यातील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी सलग आठ दिवस राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला होता, मात्र राज्यातील बहुतांशी शेतकरी हे मध्यभूधारक असल्याने सरसकट कर्जमाफी व्हायला हवी. मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आलेला सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला असला तरी त्यातील निकष आणि अटी पहाता राज्यातील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून, या संदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. कर्जमाफीला अवधी असल्याने शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीम देण्याचे आदेश शासनाने दिला असला तरी त्याचे निकष पहाता दहा हजार रुपये नको आणि कर्जमाफीलादेखील हेच निकष रहातील, असा अंदाज शेतकरी बांधत आहे. अशा अटी आणि निकष असल्यास शेतकरी कर्जमाफी देताच कशाला अशा संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या राजकीय नेत्यांना कर्जमाफी नसली तरी चालेल; मात्र सरकारी कर्मचारी असल्यास कर्जमाफी नाही, कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरी करत असल्याससुद्धा कर्जमाफी नाही तसेच नोंदणीकृत व्यवसाय असल्यास कर्जमाफी नाही याशिवाय चारचाकी गाडी असल्यासदेखील कर्जमाफी नाही, असे अनेक किचकट आणि वाटेल ते निकष लावून कर्जमाफी सरकार देणार असेल तर किती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हा संशोधनाचा विषय आहे.शेतीवरील कर्ज माफ केले पाहिजे. सरकारी नोकरी असो किंवा घरातील एखादा माणूस नोकरी करत असेल तर त्याचे कुटुंब चालत असेल मात्र शेती त्यांचीही तोट्यातच गेली आहे. चारचाकी गाडी कर्ज काढून घेतली असली तरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी सरकारकडे शेतकरी कर्जमाफी मागत  नाही तर शेतीवरील कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे कर्जमाफी हवी आहे.सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची गर्दीसायगाव : शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सायगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सायगाव येथील वि.का. सहकारी सोसायटीने कर्जदार सभासदांकडून सातबारा उतारा व आधारकार्ड या कागदपत्राची मागणी केल्याने सातबारा उतारा घेण्यासाठी परिसरातील धामणगाव, पांजरवाडी व सायगाव येथील शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसापासून सायगाव येथील शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गर्दी केली. आता सर्वांनाच कर्जमाफी मिळेल या आशेवर शेतकरी असून, शासनाने कोणतेही निकष न वापरता कर्ज बाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरपंच योगीता भालेराव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.