शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीच्या कार्यवाहीस रुग्णालयाकडूनच विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:17 IST

खाटांची आणि इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन कक्ष उभारणीत अडथळा ठरणाºया सुमारे ३१ वृक्षांची तोड करण्यास परवानगी मिळाली नसल्याचे सांगत महापालिकेवर घोंगडे झटकण्याचा प्रयत्न करणाºया जिल्हा रुग्णालयाकडूनच वृक्षतोडीच्या कार्यवाहीस विलंब केला गेल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वृक्षतोडीसाठी उच्च न्यायालयाकडूनच परवानगी मिळवावी, असे महापालिकेने लेखी कळवूनही जिल्हा रुग्णालयाने त्याबाबत कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे.

नाशिक : खाटांची आणि इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन कक्ष उभारणीत अडथळा ठरणाºया सुमारे ३१ वृक्षांची तोड करण्यास परवानगी मिळाली नसल्याचे सांगत महापालिकेवर घोंगडे झटकण्याचा प्रयत्न करणाºया जिल्हा रुग्णालयाकडूनच वृक्षतोडीच्या कार्यवाहीस विलंब केला गेल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वृक्षतोडीसाठी उच्च न्यायालयाकडूनच परवानगी मिळवावी, असे महापालिकेने लेखी कळवूनही जिल्हा रुग्णालयाने त्याबाबत कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्टमध्ये ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यावेळी, जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाकडून वाढीव इन्क्युबेटर्ससाठी नवीन कक्ष उभारणीच्या प्रस्तावात वृक्षांचा अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, खाटांच्या संख्येनुसार इन्क्युबेटर्सची संख्या ठरविली जाते. जिल्हा रुग्णालयात केवळ १८ इन्क्युबेटर्स आहेत. इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्यासाठी जिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता-बाल संगोपन केंद्राकडून नवीन कक्ष उभारणीकरिता २१ कोटींचा निधी प्राप्त झाला. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातीलच जागा निश्चित करण्यात आली परंतु, सदर जागेवर सुमारे ३१ झाडांचा अडथळा ठरत असल्याने कक्ष उभारणीचे काम रखडले. महापालिकेकडे रुग्णालय प्रशासनाने वृक्षतोडीसाठी डिसेंबर २०१६ मध्येच अर्ज दिला होता परंतु, त्याला परवानगी मिळाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, महापालिकेने वृक्षतोडीबाबतचा सर्वस्वी निर्णय हा उच्च न्यायालयाकडूनच अभिप्रेत असल्याचा दावा करत त्याच्या कार्यवाहीस जिल्हा रुग्णालयाकडूनच विलंब झाल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने डिसेंबर २०१६ मध्ये १६ वृक्षांची तोड करण्याचा अर्ज महापालिकेला दिला होता. मात्र, त्या अर्जात काही अपूर्तता असल्याने पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान, महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीचा माहोल संपल्यानंतर रुग्णालयाने एप्रिल २०१७ मध्ये महापालिकेला वृक्षतोडीसंबंधी स्मरणपत्र दिले. परंतु, उच्च न्यायालयात दाखल वेगवेगळ्या जनहित याचिकांमुळे वृक्षतोडीस मनाई हुकूम असल्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोडीसंदर्भात उच्च न्यायालयाकडूनच परवानगी घेणे योग्य राहील, असे लेखी पत्र रुग्णालय प्रशासनाला ७ जून २०१७ रोजी पाठविले होते. त्यानुसार, रुग्णालय प्रशासनाने उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून वृक्षतोडीसंदर्भात परवानगी मिळविणे अपेक्षित होते.