शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:42 IST

वारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.

पुंडलिकराव थेटेवारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.वारकºयांप्रमाणेच मीदेखील नियमित वारीला जातो. माझे वडील भाऊराव थेटे हे वारकरी होते. ते नियमित वारीला जात असत. त्यांच्या निधनानंतर मीदेखील आमच्या पंचवटीतील श्रीराम वारकरी मंडळाच्या माध्यमातून वारीला जाऊ लागलो. या काळात वारकºयांचे जीवन मला जवळून बघता आले. त्यानंतरच्या काळात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम करीत असताना वारकºयांची सेवा करण्याचे कार्य घडले.संत निवृत्तिनाथ पालखीचा सात मानाच्या पालख्यांमध्ये समावेश असतो. त्यामुळे साहजिक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांप्रमाणे आमच्या पालख्यांमधील सहभागी दिंडी आणि वारकºयांची संख्या मोठी असते. त्यातच लांबचा प्रवास असल्याने मुक्कामी ठिकाणेही जास्त असतात. याठिकाणी वारकºयांना पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, डॉक्टर व औषधी तसेच अन्य साधनसामग्रीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ट्रस्टमार्फत प्रयत्न करतो या कार्यासाठी हजारो ‘दात्यांचे’ हात पुढे येतात; परंतु यासाठी महिनाभरापासून जुळवाजुळव करावी लागते. याठिकाणी काही वेळा कमतरता असते; परंतु वारकरी कशाचीही पर्वा न करता पायी चालत राहतात. पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. यावारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात.भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो. येथे लौकिक संसाराचे भान राहत नाही, अलौकिक सुखाचा मार्ग समोर दिसत असतो. ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’असा दृढभाव येथे असतो.(लेखक, संत निवृत्तिनाथसंस्थानचे विश्वस्त)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम