शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:42 IST

वारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.

पुंडलिकराव थेटेवारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.वारकºयांप्रमाणेच मीदेखील नियमित वारीला जातो. माझे वडील भाऊराव थेटे हे वारकरी होते. ते नियमित वारीला जात असत. त्यांच्या निधनानंतर मीदेखील आमच्या पंचवटीतील श्रीराम वारकरी मंडळाच्या माध्यमातून वारीला जाऊ लागलो. या काळात वारकºयांचे जीवन मला जवळून बघता आले. त्यानंतरच्या काळात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम करीत असताना वारकºयांची सेवा करण्याचे कार्य घडले.संत निवृत्तिनाथ पालखीचा सात मानाच्या पालख्यांमध्ये समावेश असतो. त्यामुळे साहजिक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांप्रमाणे आमच्या पालख्यांमधील सहभागी दिंडी आणि वारकºयांची संख्या मोठी असते. त्यातच लांबचा प्रवास असल्याने मुक्कामी ठिकाणेही जास्त असतात. याठिकाणी वारकºयांना पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, डॉक्टर व औषधी तसेच अन्य साधनसामग्रीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ट्रस्टमार्फत प्रयत्न करतो या कार्यासाठी हजारो ‘दात्यांचे’ हात पुढे येतात; परंतु यासाठी महिनाभरापासून जुळवाजुळव करावी लागते. याठिकाणी काही वेळा कमतरता असते; परंतु वारकरी कशाचीही पर्वा न करता पायी चालत राहतात. पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. यावारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात.भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो. येथे लौकिक संसाराचे भान राहत नाही, अलौकिक सुखाचा मार्ग समोर दिसत असतो. ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’असा दृढभाव येथे असतो.(लेखक, संत निवृत्तिनाथसंस्थानचे विश्वस्त)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम