शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:42 IST

वारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.

पुंडलिकराव थेटेवारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.वारकºयांप्रमाणेच मीदेखील नियमित वारीला जातो. माझे वडील भाऊराव थेटे हे वारकरी होते. ते नियमित वारीला जात असत. त्यांच्या निधनानंतर मीदेखील आमच्या पंचवटीतील श्रीराम वारकरी मंडळाच्या माध्यमातून वारीला जाऊ लागलो. या काळात वारकºयांचे जीवन मला जवळून बघता आले. त्यानंतरच्या काळात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम करीत असताना वारकºयांची सेवा करण्याचे कार्य घडले.संत निवृत्तिनाथ पालखीचा सात मानाच्या पालख्यांमध्ये समावेश असतो. त्यामुळे साहजिक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांप्रमाणे आमच्या पालख्यांमधील सहभागी दिंडी आणि वारकºयांची संख्या मोठी असते. त्यातच लांबचा प्रवास असल्याने मुक्कामी ठिकाणेही जास्त असतात. याठिकाणी वारकºयांना पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, डॉक्टर व औषधी तसेच अन्य साधनसामग्रीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ट्रस्टमार्फत प्रयत्न करतो या कार्यासाठी हजारो ‘दात्यांचे’ हात पुढे येतात; परंतु यासाठी महिनाभरापासून जुळवाजुळव करावी लागते. याठिकाणी काही वेळा कमतरता असते; परंतु वारकरी कशाचीही पर्वा न करता पायी चालत राहतात. पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. यावारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात.भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो. येथे लौकिक संसाराचे भान राहत नाही, अलौकिक सुखाचा मार्ग समोर दिसत असतो. ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’असा दृढभाव येथे असतो.(लेखक, संत निवृत्तिनाथसंस्थानचे विश्वस्त)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम