शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

‘मुक्त’च्या उपकेंद्रांमध्येही होणार पदवीप्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:24 IST

मुक्त विद्यापीठाने यंदा ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून कामकाजात आमूलाग्र बदल केला असतानाच आता विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी राज्यातील विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

नाशिक : मुक्त विद्यापीठाने यंदा ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून कामकाजात आमूलाग्र बदल केला असतानाच आता विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी राज्यातील विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.  यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने परीक्षा पद्धती, मूल्यांकन आणि निकालाच्या बाबतीत वेगाने बदल करून विद्यार्थ्यांच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षा यंत्रणेनेतील दोष आणि निकालातील विलंब दूर करण्यासाठी यंदा विद्यापीठाने अनेक बदल केले आणि त्याचाच लाभ म्हणजे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, केंद्रीय मूल्यांकन पद्धतीचा अवलंब यामुळे ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.  निकालात एकीकडे गतिमानता आली असताना त्यांना विद्यापीठाशी जोडून घेण्यासाठी विद्यापीठाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विद्यापीठात दरवर्षी पदवीप्रदान सोहळा केला जातो. यासाठी राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करून विद्यापीठाच्या सोहळ्याला उपस्थित राहावे लागते. हा सोहळा म्हणजे विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यातील कृतज्ञता सोहळा असतो. परंतु या सोहळ्याला सर्वच विद्यार्थी उपस्थित राहू शकत नसल्याने विद्यापीठाने आता विभागीय केंद्रांनादेखील पदवीप्रदान सोहळा कार्यक्रम करण्याची सूचना केली आहे. मुक्त विद्यापीठाचे अमरावती, औरंगाबाद, मुंंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड येथे विभागीय केंद्रे आहेत. नऊ विद्याशाखांमध्ये लाखो विद्यार्थी या केंद्रांमधून परीक्षा देऊन उत्तीर्ण होत आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडून घेण्यासाठी किंबहूना त्यांच्यात विद्यापीठाविषयी आदराची भावना निर्माण करण्यासाठी पदवीप्रदान सोहळाच विभागीय केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ