शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

वनसंपत्तीचा ऱ्हास

By admin | Updated: February 12, 2017 22:42 IST

वृक्षप्रेमींमध्ये नाराजी : वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप

जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंबासन गावाच्या पूर्व भागात वनविभागाचे निमधरा आणि सौंदरा अशी दोन जंगले आहेत. हिरवाईने नटलेले हे वनक्षेत्र आजूबाजूने डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. मात्र हिरवाईने बहरलेल्या वनराईकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही वनसंपत्ती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या जंगलांतील वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालत लाकूडतोड्यांनी निमधरा जंगल पुर्णत: ओसाड करून टाकल्याने, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, त्यामुळे वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तीन वर्षांपूर्वी वनविभागाने या जंगलात लाखो रुपये खर्च करून दशमूळ योजना राबविली होती. मात्र वनविभागाचे लक्ष नसल्यामुळे ही योजना बारगळली. यामुळे शासनाचा लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे.काही अंशी उरलेल्या सौंदरा जंगलातील हिरव्यागार वृक्षांकडे लाकूडतोड्यांनी आपला मोर्चा वळविल्याने बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनविभागातील जंगलसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, वेळीच वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)