शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

एकदिवसीय लाक्षणिक  संपामुळे व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:00 IST

सरकारच्या बॅँक एकत्रीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे बॅँकांचे दैनंदिन व्यवहार बंद होते. दि. २५ रोजीची सुटी आणि लगोलग संपामुळे बॅँका सलग दोन दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते.

नाशिक : सरकारच्या बॅँक एकत्रीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे बॅँकांचे दैनंदिन व्यवहार बंद होते. दि. २५ रोजीची सुटी आणि लगोलग संपामुळे बॅँका सलग दोन दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील सर्व सरकारी बॅँक कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला. टिळकपथ रस्त्यावरील बॅँक आॅफ महाराष्टÑसमोर सकाळी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या एकत्रीकरण धोरणाचा निषेध नोंदविला.  बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या विरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाºयांनी हा संप पुकारला होता. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला होता. बॅँकांचे एकत्रीकरण हे देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक असून, यामुळे बॅँक आणि ग्राहकांच्याही हिताचे संरक्षण होणार नाही. बॅँकिंग क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रीकरण करणे हा मार्ग नसून त्यावर सार्वत्रिक तोडगा काढणे अपेक्षित असल्याची भूमिका बॅँक संघटनांनी घेतली आहे.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका या आंदोलनात सहभागी झाल्याने सर्व बॅँकिंग व्यवहार बंद होते. विलीनीकरणामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक शाखा बंद होण्याची भीती संघटनांनी वर्तविली आहे. बॅँकांच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना असल्या तरी अजूनही ३० टक्के जनतेच्या कुठल्याच बॅँकेत खाते नाही.  त्यासाठी बॅँकांचा विस्तार होणे अपेक्षित असताना बॅँकांचे एकत्रीकरण केले तर अनेक खाती उघडलीच जाणार नाहीत, अशीदेखील एक भीती व्यक्त करण्यात आली आहे.रोजगार हिरावून घेण्याचा प्रकारएकत्रीकरणामुळे काय होऊ शकते, हे सहयोगी बॅँकांच्या स्टेट बॅँकेतील विलीनीकरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती डोळ्यासमोर असताना सरकारचा एकत्रीकरणाचा निर्णय अनाकलनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. एकत्रीकरणामुळे कर्मचारी, अधिकारी अतिरिक्त होतील, स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होऊन कर्मचाºयांचा रोजगार हिरावला जाऊ शकतो, नोकरीतील सुरक्षितता संपुष्टात येऊन अनिश्चितता निर्माण होऊ शकते, रोजगार निर्मिती एकीकडे होत असताना सरकार बॅँकांमधील रोजगार कमी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :bankबँकStrikeसंप