शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

अन्न पाण्याच्या शोधात हरिण, काळवीट मानवी वस्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर व परिसरात अन्न पाण्याच्या शोधात काळविटे, हरणाची मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कळपांनी वाटचाल ...

ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर व परिसरात अन्न पाण्याच्या शोधात काळविटे, हरणाची मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कळपांनी वाटचाल होताना दिसून येत आहे. राजापूर,ममदापूर परिसरात हरणांना खाण्यासाठी सध्या उन्हाळ्यात जिकडे-तिकडे वाळलेले गवत असल्याने हरिण व काळवीट अन्न पाण्याच्या शोधात उन्हाने तप्त झालेले ढेकळे पायाखाली तुडवत भटकंती करताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने उन्हाळ्याच्या झळा या तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस तुलनेत काळवीट हरणांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी हरणांना व इतर काही जंगली प्राण्यांना चांगल्या प्रकारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे .परंतु काही वनक्षेत्रात कुठेच पाण्याची चाहूल लागत नाही त्यामुळे हरिण काळवीट हे सध्या अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कळपा-कळपाने भटकंती करताना दिसून येत आहेत. राजापूर, ममदापूर वनविभागाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभले असून परिसरात राजापूर, ममदापूर ,रेंडाळे, सोमठाण जोश,खरवंडी देवदरी ,कोळगाव. आदी गावांचा समावेश होतो. परिसरातील गावातील मिळून साडेसात हजार हेक्टरवर असून यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापूर राखीव हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये राजापूर, ममदापूर खरवंडी ,सोमठाण जोश ,या पाच गावांचा वनक्षेत्रात समावेश असून प्रत्येक गावात पशुपक्ष्यांना संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके निर्माण केली त्यामुळे हरणांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

------------------

काही ठिकाणी सुविधा

राजापूर, ममदापूर व परिसरात हरणांची संख्या ही जास्त असल्याने हरणांना वनविभागाने विविध ठिकाणी पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. पण काही भागात हरिण पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे जाताना दिसत आहे .आतापर्यंत अनेक हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना इथून मागे बऱ्याच वेळेस घडल्या आहेत. वनविभागाकडून शेतकऱ्यांच्या विहिरींना कठाडे किंवा लोखंडी जाळ्या बसविण्यात याव्या अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.

---------------------

कृत्रिम पाणवठ्यांची गरज

हरणांना पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाने मानवी वस्तीकडे देखील पाणवठे ठेवून वेळोवेळी हरणांना, मोरांना पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. कारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातच विहिरी तळ गाठतात. त्यामुळे माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. त्यामुळे वनविभागाने आता जागोजागी कृत्रिम का होईना पाणवठे तयार करून काही ठिकाणी हरणांना पाणी मिळेल अशी सुविधा वनविभागाने करावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्ग करत आहे. (२७ ममदापूर १/२)

===Photopath===

270521\27nsk_10_27052021_13.jpg

===Caption===

२७ ममदापूर १/२